वकिलांनी ‘पीके’तील रिमोट व्हावे

By Admin | Updated: February 15, 2016 02:17 IST2016-02-15T02:16:06+5:302016-02-15T02:17:28+5:30

समाजाची दिशा ‘पीके’ सिनेमातील रिमोट हरविलेल्या ‘पीके’ सारखी झाली आहे. वकिलांमध्ये हा रिमोट होण्याची क्षमता आहे.

Advocates become remote in PK | वकिलांनी ‘पीके’तील रिमोट व्हावे

वकिलांनी ‘पीके’तील रिमोट व्हावे

भूषण धर्माधिकारी : विदर्भ प्रदेश अधिवक्ता परिषदेचे एकदिवसीय शिबिर
वर्धा : समाजाची दिशा ‘पीके’ सिनेमातील रिमोट हरविलेल्या ‘पीके’ सारखी झाली आहे. वकिलांमध्ये हा रिमोट होण्याची क्षमता आहे. वकिलांनी समाजासाठी तो रिमोट झाले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेद्वारे संचालित विदर्भ प्रदेश अधिवक्ता परिषदेच्यावतीने सेवाग्राम येथील शांती भवनात शनिवारी एकदिवसीय शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला भारत सरकारचे सहायक महाधिवक्ता अनिल सिंग, राज्य सरकारचे सहायक महाधिवक्ता रोहीत देव, अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे संघटक ज्योदीप रॉय, परिषदेचे अध्यक्ष मधुकर सोमलवार, जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ‘बदलत्या काळातील वकिलांची सामाजिक व कायदेशीर भूमिका’ विषयावर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी उद्घाटनपर सत्रात अनिल सिंग यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.
पुढे बोलताना न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की, न्यायदेवतेच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीविषयी समजून घेणे आवश्यक आहे. ती पट्टी आपण बांधली आहे. बरेचदा प्रकरणांमध्ये पोलीस झपाट्याने तपास करतात. चार्जशिट दाखल करतात. न्यायालय कोणालाही निर्दोष सोडत नाही. प्रकरणामध्ये असलेल्या त्रूट्या न्यायालय समाजापुढे आणते. अपघाताचे उदाहरण देत न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनाची नोंद होते. मग, हे अज्ञात वाहन सांगण्याची जबाबदारी समाजातील नागरिकांची आहे. न्यायालयापुढे एकच काम आहे, ज्या माणसाला गुन्हेगार म्हणून न्यायालयासमोर आणले तो गुन्हेगार आहे वा नाही. गुन्हेगार कोण आहे, हे शोधण्याची जबाबदारी न्यायालयाची नाही. ती जबाबदारी समाजाची, पोलिसांची आहे. शहरामध्ये इमारतींचे जंगल उभे झाल्याचे दिसते. झाडे सोयीस्कररित्या कापली जात आहेत. पुढील काळात बांधकाम पाडून झाडे लावावी लागणार आहेत, असेही न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. अजित सदावर्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्ही.टी. देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील वकील प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Advocates become remote in PK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.