शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासन अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात सुमारे ८ हजार ७८९.८६ हेक्टर शासकीय जमीन आहे. परंतु, सध्यास्थितीत किती शासकीय जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची ठोस माहितीच जिल्हा प्रशासनाकडे नाही.

ठळक मुद्देदुर्लक्षित धोरण जबाबदार : ५२,०७७.५१३ हजार हेक्टर जमीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचे वास्तव आहे. परंतु, नेमक्या किती जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची माहितीच सध्या जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे उजेडात आले आहे. या प्रकाराला दुर्लक्षीत धोरण जबाबदार असल्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात सुमारे ८ हजार ७८९.८६ हेक्टर शासकीय जमीन आहे. परंतु, सध्यास्थितीत किती शासकीय जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची ठोस माहितीच जिल्हा प्रशासनाकडे नाही.दिवसेंदिवस लोकवसाहती वाढत असून बोगस एनए आणि टीपीचा गौडबंगाल कायम असताना जिल्हा प्रशासनाकडे शासकीय जमिनींवरील अतिक्रमणाची माहितीच नसल्याने अधिकाऱ्यांचे दुर्लक्षीत धोरण भूखंड माफियांसाठी चांदीच ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देत तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.कारंजा(घा.) तालुक्यात शासकीय जागाच नाही?कारंजा (घा.) तालुक्यात एकूण सुमारे ३ हजार ३७१ शासकीय जमिनींचे सर्वे क्रमांक आहेत. परंतु, या तालुक्यात नेमकी किती हेक्टर शासकीय जमीन आहे याचीही आकडेवारी सध्या जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे कारंजा (घा.) तालुक्यात शासकीय जमीन नाही काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.ज्यांच्या अधिकारक्षेत्रात जमीन तोच विभाग काढणार अतिक्रमणराष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात एकूण सुमारे ५२ हजार ७७.५१३ हेक्टर शासकीय जमीन आहे. याच जिल्ह्यातून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान यज्ञाला सुरूवात करीत त्याला दिशा देण्याचे काम केले. परंतु, त्यांच्याच कर्मभूमीतील किती शासकीय जमिनीवर सध्या अतिक्रमण आहे याची आकडेवारीच जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या अधिकारक्षेत्रात शासकीय जमीन आहे त्याच विभागाकडे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी शासनाच्या सूचनेवरून देण्यात आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण