धडक मोहिमेंतर्गत २ हजार ५४९ दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:11+5:30
उल्लंघन करणाऱ्यांवर अंमलबजावणीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. २० व २१ जून रोजी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ३ हजार ९९३ व्यक्तींवर गुन्हे दाखल करून ८ लाख दंड वसूल केला होता. गुरुवारी पुन्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत दुकानांवर कारवाई केली. यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुकानात गर्दी करणे आदी बाबींचा समावेश होता.

धडक मोहिमेंतर्गत २ हजार ५४९ दुकानांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे शासनाने बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत १०० दुकानांना टाळे ठोकले. २ हजार ५४९ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली, तर तर १ लाख ९८ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबवल्या. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा सर्वांत कमी प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळतो. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.
मात्र, उल्लंघन करणाऱ्यांवर अंमलबजावणीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. २० व २१ जून रोजी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ३ हजार ९९३ व्यक्तींवर गुन्हे दाखल करून ८ लाख दंड वसूल केला होता.
गुरुवारी पुन्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत दुकानांवर कारवाई केली. यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुकानात गर्दी करणे आदी बाबींचा समावेश होता.
संपूर्ण जिल्ह्यात एकावेळी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामविकास विभागाने कारवाई केली. १० नगरपालिका आणि ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २ हजार ५४९ दुकानांवर कारवाई करत १०० दुकाने सील करण्यात आली. तसेच १ लाख ९८ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. गुरुवारी, २ जुलै रोजी राबविण्यात आली. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.
आर्वीत दोन दुकाने सील, १४ जणांना दंड
देऊरवाडा/आर्वी : शहरात पाच व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे दोन दिवसांकरिता प्रतिष्ठाने सील करण्यात आली. तसेच तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधल्याशिवाय फिरणाऱ्या १४ व्यक्तींकडून २ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यांत आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, ठाणेदार संपत चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांच्या मार्गदर्शनात निगराणी पथकातील साकेत राऊत, सौरभ निखारे, तुषार येळणे, महेंद्र शिंगाने, प्रशांत सोनवाल, निकाजू, शिवा चिमोटे, अरुण पंड्या, पोलीस शिपाई उमेश कुंभरे, प्रदीप दातारकर यांच्यासह इतर कर्मचाºयांनी केली.