शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

विलगीकरणासाठी शहरातील अठरा शाळा अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

कोविड-१९ साथरोग प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील लोकांना विलगीकरण करुन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. आता त्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.आता आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात अडकून पडल्याने ते आता गावाकडे येत आहे.

ठळक मुद्देएसडीओेंचा आदेश : शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून तसेच कोरोनग्रस्त भागातून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत साडेआठ हजारावर व्यक्ती शहरात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे प्रमाण आणखी वाढणार असून ज्यांना घरी विलगीकरणात राहणे शक्य होणार नाही, अशांकरिता प्रशासनाकडून शहरातील १८ शाळा, महाविद्यालये अधिग्रहित केले असून शाळा व्यवस्थापनाने तेथे व्यवस्था करुन देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिले आहे.कोविड-१९ साथरोग प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील लोकांना विलगीकरण करुन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. आता त्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.आता आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात अडकून पडल्याने ते आता गावाकडे येत आहे. यापुढेही ते येणार असल्याने गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मार्फत माहिती प्राप्त करुन त्यांना १४ दिवसाकरिता गृह विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. पण, काहींची घरे लहान असल्यामुळे तेथे आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असतो किंवा घरातील इतर व्यक्तीची अडचण होते. त्यामुळे अशा व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करणे सर्वांच्याच दृष्टीने सोयीचे असल्याने गावातील, शहरातील शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.वर्ग खोल्यांमधील फर्निचर इतरत्र ठेवून आवश्यकतेनुसार वर्ग खोल्या खाली करुन द्याव्या तसेच वीज, पंखे, पाणी, स्वच्छता व सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याच्या सूचना अधिग्रहित केलेल्या शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना दिल्या आहे.नागठाणा येथील अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय आधीच अधिग्रहित करण्यात आले आहे. आता आणखी १७ असे एकूण १८ शाळा व महाविद्यालये अधिग्रहित केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या