भूसंपादन कायद्यानुसार समृद्धी महामार्गाकरिता जमिनी घ्या

By Admin | Updated: January 22, 2017 00:36 IST2017-01-22T00:36:09+5:302017-01-22T00:36:09+5:30

समृध्दी महामार्गाकरिता जमिनी भूसंपादन कायद्याअंतर्गत अधिग्रहीत करण्यात याव्या.

According to the Land Acquisition Act, take land for the prosperity highway | भूसंपादन कायद्यानुसार समृद्धी महामार्गाकरिता जमिनी घ्या

भूसंपादन कायद्यानुसार समृद्धी महामार्गाकरिता जमिनी घ्या

 शासनाला साकडे : अद्याप भूमिका स्पष्ट नाही
वर्धा : समृध्दी महामार्गाकरिता जमिनी भूसंपादन कायद्याअंतर्गत अधिग्रहीत करण्यात याव्या. अशी मागणी निवेदनातून समृध्दी महामार्ग संघर्ष समितीद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर केले.
जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गाबाबत शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत भीती व असुरक्षिततेचे वातावरण आहे. नागपूर-मुंबई हा ७१० किलोमीटरचा महामार्ग खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला समृध्द करणारा आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातील गावातून मार्ग जाणार आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना जमीन मोजणीकरिता पत्र पाठविले. याची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम कायम आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत शासनाने जमिनी अधिग्रहीत कराव्यात. किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन आखणी बाहेर राहत असल्यास अशी जमीन भूसंपादनद्वारे प्राप्त करता येते, असे परिच्छेद ५ मध्ये नमूद केले आहे. सरसकट जमिनीसाठी भूसंपादन कायदा लागू केला नाही. त्यामुळे भूसंपादन कायद्याअंतर्गत व्हावे अशी मागणी आहे. यावेळी संजय काकडे, श्याम वानखेडे, मिलिंद हिवलेकर आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: According to the Land Acquisition Act, take land for the prosperity highway