शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

 मत्स्य अधिकाऱ्यांचा अपघात, बोटितून उतरताना एकाचा मृत्यू चौघे बालंबाल बचावले; रात्रीची तपासणी बेतली जिवावर 

By चैतन्य जोशी | Updated: November 19, 2023 18:09 IST

मत्स्योद्योग विभागाचा एक अधिकारी व चार कर्मचारी बोरधरण परिसरात असलेल्या केजची तपासणी करण्यासाठी गेले.

वर्धा : मत्स्योद्योग विभागाचा एक अधिकारी व चार कर्मचारी बोरधरण परिसरात असलेल्या केजची तपासणी करण्यासाठी गेले. मात्र, तपासणी आटोपून ते परत केज परिसराकडे जात असताना बोटीतून उतरताना झालेल्या अपघातात प्रशासकीय अधिकाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर चौघे कर्मचारी थोडक्यात बचावले. ही घटना सेलू तालुक्यातील बोरधरण परिसरात १८ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे रात्रीची ही तपासणी चांगलीच चर्चेत आली असून मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

युवराज खेमचंद फिरके (५३ रा. ठाणे, मुंबई ह.मु. नागपूर) असे मृतक प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके यांच्यासह मत्स्य निरीक्षक सुनिल भिमराव ठाकरे (५७ रा. नागपूर), विभागीय व्यवस्थापक बंसी योगीराम गहाट (५८ रा. औरंगाबाद ह.मु. नागपूर), मयंक विजयसिंग ठाकूर (४० रा.गाझीयाबाद ह.मु. नागपूर ), सहायक मत्स्य विकास अधिकारी योगेश मोहनलाल कठाणे (३४ रा. बल्लारशह ह.मु. नागपूर) असे पाच अधिकारी बोर धरण येथील केजची तपासणी करण्यासाठी नागपूर येथून आले होते.

 रात्रीला जवळपास ८ वाजेनंतर त्यांनी तपासणीला सुरुवात केली आणि ते तपासणी करुन ९ वाजताच्या सुमारास परत केजकडे जात असताना बोटीवरून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तेथील प्लास्टीकच्या ड्रमवरुन पाचही जणांचा पाय घसरल्याने ते नदीपात्रात पडले. चौघांनी लगतच असलेल्या दोराला पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचला पण नागपूर येथील मत्स्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत धरणाच्या पाण्यात खोलवर फसलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पण, काळोख असल्याने शोध लागू शकला नाही. घटनास्थळी सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे हे रात्रीलाच कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. रविवारी सकाळीच नागपूर येथील राज्य आपत्ती निवारण दलाच्या चमूंनी धाव घेतली असून धरणातील पाण्यात मृतक युवराज फिरके यांचा शोध सुरु केला आहे. बातमी लिहेपर्यंत मृतदेह सापडला नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांनी दिली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा