शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

युरियाच्या टंचाईत ‘लिंकिंग’ची मुबलकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापाशी व तूर हे प्रमुख पिके असून २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : जिल्ह्यात ३० हजार मेट्रिक टनची गरज, केवळ १६ हजार मेट्रिक टनची उपलब्धता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाची हुलकावणी, बियाण्यांमधील उगवण क्षमतेच्या अभावाने दुबार पेरणीच्या संकटातून सावरत पिके जगविण्यासाठी धडपडत असलेल्या शेतकऱ्यांना आता युरियाची आवश्यकता आहे. पण, अद्यापही जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यांपर्यंत आवश्यक असलेला युरियाचा साठा उपलब्ध झाला नाही. याचाच फायदा उचलत काही विक्रेते युरियाबरोबर इतर खत किंवा औषधी घेण्याची सक्ती करीत असल्याने शेतकऱ्यांची मोठी लूट होत असल्याची ओरड होत आहे पण; कृषी विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापाशी व तूर हे प्रमुख पिके असून २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.त्यानुसार जिल्ह्यात सध्या ७० टक्केच्यावर पेरण्या आटोपल्या आहे पण, पावसाच्या दडीमुळे सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात गेल्या आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना आता खत देण्याची लगबग सुरु आहे. यासाठी युरियाची शेतकऱ्यांकडून मागणी होत असताना पुरवठ्याअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत ४३ हजार ८१ मेट्रीक टनचे आवंटन असून १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत ३० हजार मेट्रीक टन युरियाचा पुरवठा होणे अपेक्षित होते.पण, केवळ १७ हजार ११४ मेट्रीक टनच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची अडचण वाढली असून याचाच फायदा घेत काही विक्रेते एका थैलीमागे ५० ते ७० रुपये जास्त घेऊन नेहमीच्याच ग्राहकाला देत आहे. इतरांसाठी यापेक्षाही जास्त दर आकारले जातात किंवा त्यांना परतवून लावले जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.नाईलाजास्तव गरज असल्याने शेतकरी वाढीव दर आणि लिंकिंगचा भार सोसत युरियाची खरेदी करीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देत शेतकºयांची होणारी लूट तात्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.हिंगणघाटात केवळ एकच रॅक पॉर्इंटयावर्षी लॉकडाऊनमुळे युरिया पोहोचायला वेळ झाला असला तरी आलेल्या युरियाची सोयीनुसार विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यामध्ये हिंगणघाट रेल्वे स्थानकावर एकमेव रॅक पॉर्इंट आहेत. त्या ठिकाणी आलेला युरिया ४८ तासांत विक्रेत्यांपर्यंत पोहोचवायचा असल्याने पुरवठादाराकडून रॅक पॉईटपासून जवळ असलेल्या ठिकाणीच युरियाचा पुरवठा केला जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यामध्ये त्यांच्या हक्काचा युरिया पोहोचत नसल्याने विक्रेत्यांसह शेतकºयांचीही अडचण झाली आहे.डीएपी खताकरिता शेतकऱ्यांची होतेय धडपडजिल्ह्यात १७ हजार ४६९ मेट्रीक टन डीएपीचे आवंटन असताना ८ हजार ५१८ मेट्रिक टनच डीएपी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या दिवसातही शेतकऱ्यांना युरिया व डीएपी मिळत नसल्याने खताअभावी उत्पादनात घट होण्याची शक्यताही शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.शेतकरी सोयाबीन, कपाशी व इतर पिकांसाठी सरळ खत म्हणून युरिया व डिएपीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण, या दोन्ही खतांचा जिल्ह्यात सध्या तुटवडा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. शेतकऱ्यांना यावर्षी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आधी बियाणे तर आता खताच्या अडचणी असल्याने उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये युरियाचा पुरवठा होऊ शकला नाही. सप्टेंबरअखेरपर्यंत ४३ हजार मेट्रीक टनचे आवंटन आहे. १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत ३० हजार मेट्रीक टन युरियाचा पुरवठा होणे अपेक्षित होते. पण, सध्या १७ हजार मेट्रीक टन युरिया उपलब्ध झाला असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये २ हजार ६०० मेट्रीक टन युरिया उपलब्ध होणार आहे.- संजय बमनोटे, जिल्हा कृषी अधिकारी, जि.प.वर्धा.जिल्ह्यामध्ये फक्त हिंगणघाट येथील रेल्वेस्थानकावरच रॅक पॉर्इंट आहे. तेथे युरियाचा पुरवठा करणाºयावर ना कंपनीचे नियंत्रण आहे ना कृषी विभागाचे. त्यामुळे रॅक पॉईंटपासून जवळ असलेल्या गावांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये युरियाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लांबच्या ठिकाणी मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने विक्रेत्यांसह शेतकरीही अडचणीत आले आहे.- रवी शेंडे, अध्यक्ष, जिल्हा कृषी व्यवसायी संघ.

टॅग्स :agricultureशेती