शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

लोकशाही चिरडून सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न संजय सिंग यांचे टीकास्त्र : पत्रपरिषदेत भाजपावर साधला निशाणा.

By आनंद इंगोले | Published: April 22, 2024 6:34 PM

Wardha : ईडी, आयटी आणि सीबीआय चा धाक दाखवून तोडफोडीचे राजकारण करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न : संजय सिंग यांचे भाजपवर टीकास्त्र

वर्धा : लोकसभेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक अंतिम असून यानंतर निवडणूकच होणार नाही. ईडी, आयटी आणि सीबीआय या यंत्रणांच्या जोरावर तोडफोडीच्या राजकारणातून लोकशाहीला चिरडून सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा सत्तेत आल्यास भारताचे संविधान बदलणार, आरक्षण संपविणार. त्यामुळे आताच निर्णय घेण्याची गरज असल्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी केले.

महाविकास आघाडीच्या प्रचारसभेकरिता ते वर्ध्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. ते म्हणाले की, यंत्रणांचा धाक दाखवून नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकले असून त्यांना मधुमेहाचा आजार असल्याने इन्सुलिन देण्याची व्यवस्थाही केली जात नाही, हा अत्याचार आहे. येथे उद्धव ठाकरे यांचा धनुष्यबाण आणि शरद पवार यांचे घड्याळ पळविले. त्यांच्या पक्षात फूट पाडून एकमेकांच्या विरोधात उभे केले. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेश असून त्यांच्या धोरणानुसार ‘गद्दारांना माफी नाही’ ही भूमिका घेण्याची गरज आहे. देशातील महागाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, काळा पैसा, खात्यामध्ये १५ लाख, यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याने या सरकारची खोटे बोलण्याची ‘गॅरंटी’ नक्कीच आहे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे डॉ. शिरीष गोडे, इंडिया अलायन्सचे अविनाश काकडे यांच्यासह आपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान विचलितलाेकसभेचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दहा वर्षांतील सत्तेचा लेखाजोखा मतदारांनी मतातून व्यक्त केला आहे. ही निवडणूक आता पक्षाची राहिली नसून जनतेची झाली आहे. त्यामुळे एकंदरीत चित्र पाहता पंतप्रधानही विचलित झाले आहेत. हे त्यांच्या भाषणातून दिसायला लागले आहे. यावरून मतदार आता त्यांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही खासदार सिंग म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल