शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतमजूर विधवेचा निवारा भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:22 IST

रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

साहूर (वर्धा) : येथील भूमिहीन शेतमजूर विधवा लता प्रभाकर वडस्कर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील धान्य, पैसे व कपडे आदी साहित्य जळून कोळसा झाला. यामुळे लता वडस्कर यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली असून, ही घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली.

लता वडस्कर या स्थानिक गुरुदेव चौक परिसरात माती-कवेलूच्या घरात राहतात. सुमारे ११ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. शेतमजुरी करणाऱ्या लतासह लताचा मुलगा व वयोवृद्ध आई-वडिलांसाठी निवारा असलेल्या याच माती-कवेलूच्या झोपडीला सोमवारी सकाळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बघता-बघता घरातील संपूर्ण साहित्याला आगीने आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाल्याने वडस्कर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

२७ हजारांची रोख झाली कोळसा

घटनेच्या वेळी लता वडस्कर या शेतात मजुरी कामासाठी गेल्या होत्या. तर म्हातारी आई एकटी घरी होती. आग लागल्याचे लक्षात येताच आरडा-ओरड करण्यात आली. दरम्यान, परिसरातील नागिरकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांती परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी आगीत घरातील २७ हजार रुपयांची रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे लता यांनी शस्त्रक्रियेसाठी या रोख रकमेची जुळवाजुळव केली होती.

विदारक परिस्थिती बघून लता बेशुद्ध

घराला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर लता यांनी तातडीने घर गाठले. शस्त्रक्रियेसाठी जुळवाजुळव केलेली रोख रक्कम व घरातील संसारोपयोगी साहित्य जळून पूर्णत: कोळसा झाल्याचे विदारक चित्र बघताच लता यांची शुद्ध हरपली. लता यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

...अन् अधिकाऱ्यांनी गाठले घटनास्थळ

आगीची माहिती मिळताच महावितरणचे अभियंता अक्षय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच मंडळ अधिकारी प्रवीण हाडे यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी करीत पंचनामा केला शिवाय घटनेची माहिती तहसीलदार सचिन कुमावत यांना दिली. संबंधित महिलेला तातडीने धान्य उपलब्ध करून देण्यासह शासकीय निकषांप्रमाणे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन तहसीलदार सचिन कुमावत यांनी दिले आहे.

चुलीजवळ बसली अन् आगीत भाजली

पाणी गरम करण्यास ठेवून चुलीजवळ हातपाय शेकत बसली असतानाच पातळाला लागलेल्या आसीमुळे वयोवृद्धेला आग लागून ती भाजली. दरम्यान, तिच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. १५ रोजी रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. गोदावरी माधव वैद्य (७६) रा. वैष्णवी कॉम्पलेक्स कारला रोड पिपरी असे मृतकाचे नाव आहे. गोदावरी ही नेहमीप्रमाणे चूल पेटवून त्यावर पाणी गरम करीत होती. दरम्यान, ती तेथेच हातपाय शेकत बसली. हातपाय शेकत असतानाच तिच्या अंगावरील पातळाला आग लागली ती आग विझवत असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले. यात तिचा उजवा पाय, उजवा हात, पोट भाजल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. १४ रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्याची माहिती दिली.

टॅग्स :fireआगwardha-acवर्धा