शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर

By अभिनय खोपडे | Updated: August 25, 2023 18:24 IST

भारतीय सैनिक सणासुदीच्या काळात देखील सीमेवर तैनात राहून आपल्या देशाचे रक्षण करतात. 

वर्धा : शेतीत उत्पादन होणाऱ्या कडधान्य शेतमालापासून विद्यार्थीनींनी राख्या तयार करून भारताच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी पाठविल्या हा सोहळा कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी येथे रक्षाबंधनाचे निमित्ताने पार पडला. कला,वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,आर्वी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींनी कडधान्य व शेतमालापासून विशेषत: सोयाबीन,तीळ,तांदूळ,डाळ,गहू,ज्वारी,मुंग,उडीद व कापूस इत्यादी उत्पादनापासून सुंदर प्रकारच्या राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफ च्या जवानांकरिता पाठविल्या. या उपक्रमामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनीनी आपला सहभाग नोंदवून जवळपास ५० राख्या तयार केल्या. भारतीय सैनिक सणासुदीच्या काळात देखील सीमेवर तैनात राहून आपल्या देशाचे रक्षण करतात. 

त्यामुळे त्यांना आपल्या घरची आठवण नको यायला म्हणून विद्यार्थिनींनी ही अभिनव संकल्पना राबवून या सर्व राख्या त्या जवानांना पाठवून देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. सोबतच शेतकऱ्यांच्या मुलींनी शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून राख्या तयार केल्यात त्यामुळे पुन्हा जय जवान, जय किसान ही भावना वाढीस लागण्यास मदत झाली. अशी राखी तयार करणाऱ्या मुलींनी प्रतिक्रिया दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिभाऊ वेरुळकर, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा धर्मेंद्र राऊत,डॉ.भावना खंडाळकर,प्रा.राजेंद्र ढगे,प्रा.हमिद शेख,डॉ.गणेश मस्के,प्रा. मोहन कुंभरे, प्रा.नितीन शिरपूरकर,प्रा.लखन जाधव, प्रा. तनुज काळे,प्रा.प्रगती कोरडे आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :wardha-acवर्धाIndian Armyभारतीय जवानRaksha Bandhanरक्षाबंधन