शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धावत्या ट्रकने घेतला पेट; वाहनाबाहेर दोघांनी उडी घेतली थेट, अन् टळली यमदूताशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 16:12 IST

ट्रकचालकासह क्लिनरने रस्त्याकडेला वाहन उभे करीत थेट वाहनाबाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे हे दोघेही थोडक्यात बचावले.

ठळक मुद्देड्रायव्हर-क्लिनर थोडक्यात बचावले : नागपूर-अमरावती महामार्गावरील घटना

कारंजा (घा.) : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीला साजेल अशीच काहीशी घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्यासुमारास नागपूर-अमरावती महामार्गावरील राजनी शिवारात घडली. तिरोडाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रकचालकासह क्लिनरने रस्त्याकडेला वाहन उभे करीत थेट वाहनाबाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे हे दोघेही थोडक्यात बचावले.

या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रकमधील कोंबड्यांचे खाद्य तसेच ट्रक जळून कोळसा झाला. शिवदास झुमरू कोळी (वय ५५) आणि राकेश बापूराव मोरे (१९) असे अनुक्रमे थोडक्यात बचावलेल्या चालक व क्लिनरचे नाव आहे.

जेवणासाठी थांबण्यापूर्वीच ट्रकने घेतला पेट

साहित्य घेऊन मालेगाव येथून तिरोडाच्या दिशेने निघालेला (एमएच ४० सी.डी. ३१२५) क्रमांकाच्या ट्रकमधील चालक शिवदास व क्लिनर राकेश हे जेवणासाठी रस्त्याकडेला असलेल्या धाब्यावर थांबणार इतक्यात भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चालकाने मोठे धाडस करून वाहनावर नियंत्रण मिळवित वाहन रस्त्याकडेला उभे करून वाहनातील दोघांनीही वेळीच पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.

ट्रकमध्ये होते कोंबड्यांचे खाद्य

नागपूर-अमरावती महामार्गावरील राजनी शिवारात जळून कोळसा झालेला हा ट्रक कोंबड्यांचे खाद्य घेऊन तिरोडाच्या दिशेने जात होता. या घटनेत ट्रकमधील कोंबड्यांचे संपूर्ण खाद्य आणि ट्रक जळाल्याने सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे.

केबीनमध्येच झाले शॉर्टसर्किट

ट्रकच्या केबीनमध्येच शॉर्टसर्किट होऊन ट्रकने अचानक पेट घेतला. आग ट्रकला आपल्या कवेत घेत असल्याचे लक्षात येताच चालक व क्लिनरने वेळीच वाहनाबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने ते थोडक्यात बचावले. पण या घटनेत ट्रक व ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले.

अवघ्या काही मिनिटांत झाले होत्याचे नव्हते

चालक व क्लिनरने वेळीच वाहनाबाहेर पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान, आगीने अवघ्या काही क्षणातच ट्रकला आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केल्याने अवघ्या काही मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले. या घटनेची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.

बॉक्सटँकर बोलावून मिळविले परिस्थितीवर नियंत्रण

ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत टोल प्लाझा प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर पाण्याचा टँकर बोलावून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातfireआगwardha-acवर्धा