शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

दिवसाढवळ्या धान्य व्यापाऱ्याचे घर फोडले; ३१ तोळे सोने, दीड किलो चांदी, ३ लाखांची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 15:57 IST

कुलूपबंद घर केले टार्गेट

कारंजा (घाडगे) : येथील धान्य व्यापाऱ्याचा परिवार खासगी रुग्णालयात उपचाराकरिता बाहेरगावी गेल्यामुळे घर कुलूप बंद होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरात प्रवेश करुन ३१ तोळे सोने, दीड किलो चांदी आणि जवळपास ३ लाख रुपये रोख लंपास केले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली असून या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अशोक अग्रवाल या धान्य व्यावसायिकाचे शहरात घर आहे. अशोक अग्रवाल सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून दुकानात निघून गेले. तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य नागपूरला खासगी रुग्णालयात नियमित उपचाराकरिता गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीसह रोख रक्कमेवर हात साफ केला. अशोक अग्रवाल हे सायंकाळी ५ वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना अनोळखी व्यक्तीने रस्त्यात अडवून विचारपूस केली. काही वेळ येथे गेल्यानंतर ते घरी पोहोचले. कुलूप उघडून घरामध्ये शिरले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडून दिसले. त्यामुळे चोरीचा संशय आल्याने त्यांनी बाहेरगावी गेलेल्या पत्नीला फोन करून बोलावून घेतले.

पाहणी केली असता घरातील काचेच्या शोकेसमधील टेडी खाली पडला होता. त्यातील सोनं चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच बेडरूमधील लाखडी कपाटाखाली ठेवलेले सोन्या-चांदीचेही दागिने चोरून नेले. या घरातून चोरट्यांनी ३१ तोळे सोने, दीड किलो चांदी आणि जवळपास तीन लाख रुपये रोख असा एकूण १४ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, प्रभारी पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर, उपनिरीक्षक सचिन मानकर, उपनिरीक्षक केकन, सहायक उपनिरीक्षक लीलाधर उकंडे, प्रवीण चोरे, उमेश खामनकर, गुड्डू थुल, नितेश वैद्य, किशोर कापडे, कोमल वानखडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

चोरीच्या घटनेने पोलिस बुचकळ्यात

धान्य व्यापारी अशोक अग्रवाल यांचे घर कुलूपबंद होते. घराचे कुलूप चावीने उघडून अज्ञात चोरटा घरात शिरला आणि घरातील सोनेचांदी व रोख घेऊन निघून गेला. त्यामुळे चोरट्याकडे कुलपाची चावी आली कुठून असा प्रश्न पोलिसांना पडला. घरातील सोन्याचीही कोणालाही माहिती नसताना त्याच ठिकाणाहून ऐवज लंपास करण्यात आला. या घरात चार जण राहतात, त्यातील दोघांनाच याची माहिती आहे. त्यामुळे चोरट्यांकडे ही माहिती गेली कशी? त्यामुळे चोर कोण असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा