शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू, शेती साहित्य जळून खाक

By अभिनय खोपडे | Updated: September 15, 2022 10:34 IST

रेणकापूर येथील घटना; आग विझविताना दोघांना गंभीर दुखापत

समुद्रपूर ( वर्धा) : गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चार जनावरांचा मृत्यू तर, एक बैल जखमी झाल्याची घटना घडली. तर, आग विझवताना दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.  

समुद्रपूर तालुक्यातील रेणकापूर येथील शेतकरी आत्माराम निखाडे यांच्या घराजवळ असलेल्या गोठ्याला गुरुवारी मध्यरात्री तीन  वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागल्याने गोठ्याला बांधून असलेल्या पाच जनावरांपैकी चार जनावरांचा जळून मृत्यू झाला तर, एक बैल गंभीर जखमी झाला. या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्य जळून खाक झाले. गोठ्याला घर लागून असल्याने घरातील फ्रिज पंखा दिवान यांचे सुद्धा नुकसान झाले. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळतात गावातील नागरिकांनी घटनास्थळ धाव घेतली पण आगीने रौद्र रूप  धारण केले होते घटनेची माहिती नगरसेवक दिनेश निखाडे यांनी नगरपंचायतला दिली नगरपंचायतने  कर्मचारी श्रीकांत आगलावे, विजय सरोदे,यांनी पाणी टँकर घेऊन घटनास्थळावर दाखल झाले पण आग आटोक्यात येत नसल्याने हिंगणघाट येथील अग्निशामक दलाला बोलविण्यात आले अग्निशामक दलाने घटनास्थळावर पोहोचून आग आटोक्यात आणली.

या आगीत आग विझवतांनी शेतकरी आत्माराम निखाडे व मुलगा अशीच निकाळे यांना गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला व समोरचा तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे

टॅग्स :fireआगAccidentअपघातwardha-acवर्धा