शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; एका बैलाचा भाजून मृत्यू, मुरादपूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 18:03 IST

या घटनेत एका बैलाचा जळून मृत्यू झाला, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाल्याने पशुपालक रमेश हिवसे यांचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपशुपालकाचे मोठे नुकसानतीन जनावरे गंभीर जखमी

समुद्रपूर (वर्धा) : नजीकच्या मुरादपूर येथे गोठ्याला अचानक आग लागली. यात एका बैलाचा भाजून मृत्यू झाला, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली असून यात पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गावाशेजारी असलेल्या रमेश हिवसे यांच्या मालकीच्या गोठ्यातील जनावरे मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ओरडत असल्याचे लक्षात आल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. काही नागरिकांनी घराबाहेर येत पाहणी केली असता गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत गोठ्यातील साहित्याला आपल्या कवेत घेतले.

दरम्यान, काही नागरिकांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासांच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात नागरिकांना यश आले असले तरी या घटनेत एका बैलाचा जळून मृत्यू झाला, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाल्याने पशुपालक रमेश हिवसे यांचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

आगीचे कारण शॉर्टसर्किट?

गोठ्यातील बल्बच्या वॉयरमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

विविध साहित्याचाही झाला कोळसा

अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात ठेवून असलेले ऑइल इंजिन, ओलितासाठी वापरण्यात येणारे २० पाइप, शेतीविषयक विविध अवजारे जळून कोळसा झाली. आग इतकी भीषण होती की तब्बल दीड तासांच्या प्रयत्नाअंती परिसरातील नागरिकांना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

अन् अधिकाऱ्यांनी गाठले घटनास्थळ

आगीची माहिती मिळताच महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांसह तलाठी दाते, समुद्रपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राम खोत, महावितरणचे अभियंता होले आदींनी सोमवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुडे यांनी मृत जनावराचे शवविच्छेदन केले.

नुकसानग्रस्ताला शासकीय मदतीची अपेक्षा

अचानक लागलेल्या आगीमुळे पशुपालक रमेश हिवसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Accidentअपघातfireआग