शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी लागणार 97 हजार 40 क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

सन २०२१-२२ खरीप हंगामात ४ लाख ३० हजार ५० हेक्टरपैकी २ लाख २७ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, १ लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन, ७३ हजार ५५० हेक्टरवर तूर, २ हजार १५ हेक्टरवर ज्वारी, १ हजार ८३५ हेक्टरवर मका, ७१० हेक्टरवर उडीद, ४८५ हेक्टरवर मूग तसेच ६७५ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासाठी एकूण ९७ हजार ४० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून सोयाबीन, तूर तसेच कपाशीचे बियाणे काही प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.

ठळक मुद्देआवक झाली सुरू : ४ लाख ३० हजार ५० हेक्टरवर होणार लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ४ लाख ३० हजार ५० हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची लागवड होणार असून त्यासाठी एकूण ९७ हजार ४० क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सध्या बियाण्यांची आवक सुरू झाली असून शेतकरीही उन्हाळवाहीसह बियाणे खरेदीसाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुवळ करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सन २०२१-२२ खरीप हंगामात ४ लाख ३० हजार ५० हेक्टरपैकी २ लाख २७ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, १ लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन, ७३ हजार ५५० हेक्टरवर तूर, २ हजार १५ हेक्टरवर ज्वारी, १ हजार ८३५ हेक्टरवर मका, ७१० हेक्टरवर उडीद, ४८५ हेक्टरवर मूग तसेच ६७५ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासाठी एकूण ९७ हजार ४० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून सोयाबीन, तूर तसेच कपाशीचे बियाणे काही प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. तर उर्वरित बियाणे वेळीच वर्धा जिल्ह्यात कसे दाखल होईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यंदा कुठल्याही परिस्थितीत बियाण्यांची टंचाई होणार नाही असे नियोजन करण्यात आले असले तरी ३० मे रोजी संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

मध्यप्रदेशातील सोयाबीन बियाणे येणार वर्धेत- मागील वर्षी मध्यप्रदेश शासनाने महाराष्ट्राला बियाणे देण्यावर बंदी घातली होती. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र शासनाने राज्याला बियाणे मिळावे यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर सध्या महाराष्ट्राला  सोयाबीन बियाणे देण्यास मध्यप्रदेश शासनाने होकार दर्शविला आहे. त्यामुळे यंदा वर्धा जिल्ह्यात मध्यप्रदेशातील सोयाबीन बियाणे दाखल होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

कठोर निर्बंधांमुळे कृषी केंद्र आहेत बंद- झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शहरी व ग्रामीण भागातील कृषी केंद्र बंद आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील कृषी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये या हेतूने   सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत जिल्ह्यातील कृषी केंद्र सुरू, अशी मागणी कृषी केंद्र व्यावसायिकांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

३० मे रोजी होणार चित्र स्पष्ट- खरीप हंगामात कुठल्याही परिस्थिती जिल्ह्यात बियाणे टंचाई निर्माण होऊन नये, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. असे असले तरी ३० मे रोजी वर्धा जिल्ह्यात आणखी बियाण्यांची गरज पडेल काय, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती