शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

'राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी'ला येणार पोलिस छावणीचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:41 IST

पोलिस विभागाला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा

वर्धा : येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर ३ ते ५ फेब्रुवारी या काळात ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संबंधित २३ एकरांच्या मैदानाला 'राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी' असे नवीन नाव देण्यात आले आहे.

स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. असे असले तरी झेड प्लस सुरक्षा असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्धा दौऱ्याबाबतच्या अधिकृत लेखी सूचना वर्ध्याच्या पोलिस विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. व्हीव्हीआयपींच्या वर्धा दौऱ्याच्या लेखी सूचना लवकरच प्राप्त होतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असून, पोलिस विभागाने बंदोबस्ताचा नियोजनबद्ध संभाव्य आराखडा तयार केला आहे.

हे व्हीव्हीआयपी येणार

वर्धा येथे होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ताजी मेघे, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, विशेष अतिथी म्हणून आ. डॉ. विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत.

४२ समित्यांचे लाभतेय सहकार्य

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण होत आहे. स्वावलंबी विद्यालयाच्या २३ एकरांतील मोकळ्या मैदानात मंडप व विविध दालने उभारली जात असून, विविध ४२ समित्यांचे यशस्वितेकरिता सहकार्य घेतले जात आहे.

ग्रंथप्रदर्शन अन् विक्रीची ३०० दालने

संमेलनस्थळी ग्रंथप्रदर्शन व विक्रीची मुख्य मंडपापासून काही अंतरावर ३०० स्वतंत्र दालने करण्यात आली आहेत. येथे होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन दालनांत समोरासमोर पुरेशी मोकळी जागा ठेवण्यात आली आहे.

२० दालनांतून होणार शासकीय योजनांचा जागर

संमेलनस्थळी एकूण ३०० दालने असून त्यांपैकी २८० दालने ही राज्य व राज्याबाहेरून येणाऱ्या प्रकाशकांसाठी राखीव आहेत; तर २० दालनांमध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॉल राहणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.

पाच सभामंडप

* संमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी मैदानात वेगवेगळ्या आकारांचे एकून पाच सभामंडप उभारले जात आहे.

* मुख्य सभामंडप १६० बाय ३५० फुटांचा आहे.

* दुसरा सभामंडप ८० बाय १२० फुटांचा आहे.

* अन्य तीन सभामंडप प्रत्येकी ८० बाय ६० फुटांचे आहे.

  • ७,५०० खुर्च्या मुख्य मंडपात
  •  २,००० खुर्च्या अन्य मंडपात
  • ३५० निमंत्रित वक्ते अन् साहित्यिक
  • २,००० प्रतिनिधी राज्य व राज्याबाहेरील
  • १,००,००० साहित्य रसिक देणार भेट
टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा