शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

नऊ कोटी रुपयांतून डॉ. आंबेडकर उद्यानाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:45 PM

शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली.

ठळक मुद्दे१४ वर्षांपासून वाद होता न्यायालयात : शहरवासीयांची अद्ययावत उद्यानाची प्रतीक्षा संपली; वाद मिटविण्यात वर्धा पालिकेला यश

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली. नगर परिषदेत भाजपची एक हाती सत्ता आल्याने आता या उद्यानाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. अमृत योजना व सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत उद्यानाच्या विकासासाठी ९ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या उद्यानाच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.सन २००५ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सुनीता इथापे यांनी ३० लक्ष रुपये खर्च करून या उद्यानाचा विकास साधला होता. यावेळी नागरिकांना २ रुपये शुल्क आकारून उद्यानात जाण्याची सुविधा देण्यात आली होती. दरम्यान एका नगरसेवकाच्या कुटुंबाला शुल्क भरणे कमीपणा वाटल्याने वाद उफाळला. या वादातून पालिकेत ठराव घेत उद्यानाची देखभाल करणाºया महिला बचत गटाकडून कारभार काढण्यात आला होता. त्या काळापासून हा वाद कायमच होता.हा वाद न्यायालयात गेल्याने १४ वर्षांपासून उद्यानाला अवकळा आली होती. तब्बल १४ एकराच्या या परिसरात बेशरमची झुडपे, लव्हाळ, काटेरी झाडे उगवल्याने उद्यान की, झुडपी जंगल असा प्रश्न येथे येणाºयांना पत होता. आता ९ कोटी रुपयांतून त्याचा विकास होणार आहे. वर्धा शहरात राबविण्यात येणाºया अमृत योजनेतून ४ कोटी आणि सेवाग्राम विकास आराखड्यातून ५ कोटी रुपये या कामाकरिता मंजूर करण्यात आले आहे.या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी होणार आहे. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे व इतर नगरसेवक तथा पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.रंगीन कारंजे आणि चिमुकल्यांसाठी खेळणीशहरात सर्व सुविधायुक्त एकही बालोद्यान नसल्याने शहरात येणाºया पर्यटकांना बसण्याची व त्यांच्या पाल्यांना खेळण्यासाठी जागा नव्हती. ही बाब वर्धेकरांना बोचणारी होती. शिवाय येथे घडणाºया अवैद्य प्रकारामुळेही परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. या उद्यानाच्या विकासाची मागणी होत असल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी ही समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. ही समस्या मार्गी लागली असून या उद्यानात संगीतावर चालणारे रंगीन कारंजे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक व फिरण्यासाठी आकर्षक ट्रॅक विविध प्रजातीची झाडे आणि चिमुकल्यांना खेळण्यासाठी विविध खेळणी लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या या उद्यानाला १४ वर्षांपासून अवकळा आली होती. या संदर्भात विविध संघटनांची आणि न्यायालयात गेलेल्या बचत गटाशी चर्चा करून हा वाद निवळण्यात यश आले. दरम्यानच्या काळात अमृत योजनेंतर्गत विकास कामे करताना हिरवळ निर्माण करण्याचा निर्णय असल्याने या उद्यानाचा कायापालट करण्याचे संकल्पना डोक्यात आली. तेथूनच अद्यावत उद्यान निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. याला पालकमंत्र्यांनीही पाठबळ दिले.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा