शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

दुष्काळ निवारणार्थ ९२ ‘निर्माणी’ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:38 PM

यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देहिवरा अन् दिंदोडा गावात निवासी शिबिर : जाणून घेतले पाण्याचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. या दुष्काळ निवारणार्थ ‘निर्माण’च्या कृती शिक्षण उपक्रमांतर्गत सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा गावामध्ये त्रि-दिवसीय निवासी शिबीर पार पडले. यात राज्यभरातील ९२ निमार्णी युवा सहभागी झाले होते.महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने पद्मश्री डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने ‘निर्माण’ हा उपक्रम जून २००६ मध्ये सुरू झाला आहे. या उपक्रमात सहभागी झालेले राज्यासह देशभरातील युवा विविध सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहेत. शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था आणि संघटना आपापल्या परीने यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फाऊंडेश मागील तीन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदान करून राज्यातील बरीच गावे जलसंवर्धनाची कामे करत आहेत. सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा ही दोन गावे स्वत:ला पाणीदार करून घेण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. गाव पाणीदार व्हावे याच उद्देशाने हिवरा व दिंदोडा या गावात पार पडलेल्या विशेष शिबिरात नागपूर, मुंबई, अकोला, वर्धा, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, वाशिम अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले डॉक्टर, इंजिनीअर, समाजकार्य, वकील आदी सहभागी झाले होते.तयार केला आराखडाशिबिरार्थी युवांनी गाव, पाण्याचा प्रश्न, त्याची गंभीरता, त्यावरील उपाय, गावातील जीवनमान या गोष्टी अनुभवल्या आणि या पुढे मी शेती आणि पाण्यासाठी काय कृती करू शकतो त्याचा प्रत्येकांनी स्वत:चा आराखडा आखला. दोन्ही गावात एकूण ९४० घनमिटर एवढे काम झाले. ज्यामध्ये १४ लाख ११ हजार किंमतीचे ४७० टँकर पाणी सामावू शकेल. डॉ. उल्हास जाजू यांनी शिबिरार्थांना मार्गदर्शन केले.श्रमदानाने झाली सुरुवातशिबिरासाठा आलेल्यांचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तसेच शिबीराची सुरूवात श्रमदानाने झाली. श्रमदानाव्यतिरिक्त शिबिरात पाणीप्रश्न समजून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात शेती आणि पाणीप्रश्नांवर काम करणारे मंदार देशपांडे यांनी ‘पाणी आणि मी’ या विषयावर मार्गदर्शन केले. गावातील पाण्याची समस्या कशी आणि का निर्माण झाली या बाबतीत शिबिरार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.