शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

जिल्ह्यात ७५ टक्के पेरण्या

By admin | Updated: July 6, 2016 02:24 IST

यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्यांनी आधीच पेरण्यांसाठी शेतजमीन तयार करून ठेवली होती;

सततच्या पावसाने खर्च वाढणार : ५१ हजार हेक्टरमध्ये तुरीचा पेरावर्धा : यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्यांनी आधीच पेरण्यांसाठी शेतजमीन तयार करून ठेवली होती; पण मान्सून विलंबाने दाखल झाला. असे असले तरी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश पेरण्या साधल्याचे चित्र आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ७५ टक्के पेरण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यात आतापर्यंत तब्बल ५१ हजार हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाल्याचे आकडेवारी स्पष्ट करते.खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर कपाशी आणि सोयाबीन या नगदी पिकांकडे असतो; पण गत काही वर्षांपासून होत असलेली नापिकी आणि वधारलेले तुरीचे भाव पाहता यंदा तुरीचा पेरा वाढणार, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. दरवर्षी कृषी विभागाकडून पेरणीचे नियोजन केले जाते. यंदाही तुरीच्या ७१ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली जाईल, असे नियोजन करण्यात आले होते. मंगळवारपर्यंत हा आकडा ५१ हजार १११ हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. तूर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ६५ हजार हेक्टर आहे. गतवर्षी यातील ६० हजार ७५३ हेक्टरमध्ये तूर पिकाची पेरणी झाली होती. यंदा यात वाढ करून ७५ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून त्यावर तुरीची पेरणी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशीच्या लागवडीत घट आल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी २ लाख २६ हजार ४७४ हेक्टरमध्ये कपाशीची लागवड झाली होती. यंदा आतापर्यंत १ लाख ८९ हजार ६५९ हेक्टरमध्ये कपाशीची लावण करण्यात आली आहे. या पाठोपाठ सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ७६ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. आणखी २५ टक्के पेरण्या शिल्लक असल्याने सोयाबीन आणि तुरीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस उशिराने आला असला तरी गत काही दिवसांपासून समाधानकारक बरसत असल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली होती; पण ही पेरणी अत्यल्प होती. मान्सूनपूर्व पेरणी करणाऱ्या व ओलिताची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि त्या बऱ्यापैकी साधल्याचे सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात सरासरी ४ लाख २५ हजार ६५३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून ४ लाख २८ हजार ७०० हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. यातील मंगळवारपर्यंत ३ लाख २० हजार ३४७ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)खतांचा मुबलक साठा उपलब्ध, कृषी विभागाची ग्वाहीकृषी विभागाच्यावतीने यंदा खतांचे योग्य नियोजन करण्यात आले असून कृषी केंद्रांवरही करडी नजर ठेवण्यात आली आहे. यामुळे यावर्षी लिंकींग वा खतांचा तुटवडा, या तक्रारी हद्दपार झाल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांना बांधावरही खत पोहोचविण्यात आले असून खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यावर्षी १ लाख २४ हजार ४०० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. तो उपलब्ध झाला असून तालुकानिहाय नियोजन करण्यात आले. शिवाय गतवर्षीचा ३३ हजार ४८० मेट्रीक टन खताचा साठाही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. गळीत धान्यात सोयाबीनलाच पसंतीकमी कालावधीचे पीक असलेल्या सोयाबीनकडे गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वळलेला आहे. यंदाही जिल्ह्यासत बऱ्यापैकी सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाने १ लाख १० हजार हेक्टरचे नियोजन केले असताना मंगळवारपर्यंत ७६ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाल्याचे सांगण्यात आले.