शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

७३५ शेतकऱ्यांनी दिली ‘समृद्धी’करिता जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:00 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकरी खातेदारांपैकी ७३५ शेतकरी खातेदारांकडून जमीन खरेदी खत व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे८६.८ टक्के क्षेत्राचे संपादन । ३५०.४२ कोटींवर मोबदला वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकरी खातेदारांपैकी ७३५ शेतकरी खातेदारांकडून जमीन खरेदी खत व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. जिल्ह्यात ८६.८ टक्के क्षेत्र संपादनाचे काम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना ३५०.४२ कोटी १७ लाख ७ हजार ९५ रुपयांचे वाटप मोबदल्याच्या रूपाने करण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा, सेलू, आर्वी तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाला आहे.महाराष्ट्र समृद्धी महामार्गात सेलू तालुक्यातील ३९९, वर्धा तालुक्यातील २९२ व आर्वी तालुक्यात १८५ शेतकरी खातेदारांची जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात २५७.०६२, वर्धा तालुक्यात २०६.१७२ व आर्वी तालुक्यात ११६.२३ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. आतापर्यंत ७७३ शेतकऱ्यांकडून संमती मिळविण्यास शासनाला यश आले आहे. यामध्ये सेलू तालुक्यात संपूर्ण ३३९ शेतकºयांकडून जमीन घेण्यात आल्या. तर वर्धा तालुक्यात २९२ पैकी २७१ शेतकºयांकडून जमिनी घेण्यात आल्या.आर्वी तालुक्यात १८५ पैकी १६२ शेतकºयांकडून जमीन देण्याबाबत संमती मिळविण्यात आली. ७७३ शेतकºयांनी महामार्गाला जमीन देण्यास संमती दर्शविली असली तरी ७३५ शेतकºयांकडून खरेदी खत करून घेण्यात आले आहे. उर्वरित १४१ शेतकºयांकडून खरेदी खत करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सेलू तालुक्यात ६८, वर्धा तालुक्यात ५२ व आर्वी तालुक्यात २० शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. शेतकºयांकडून जमिनी खरेदी करून सेलू तालुक्यात २२१.५८४६ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यात १७५.६२२, आर्वी तालुक्यात १०१.६१ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ४९८.८१६६ हेक्टर क्षेत्र संपादीत केले आहे. उर्वरीत ८०.६४७४ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सेलू तालुक्यात खरेदी खत झालेल्या खातेदारांची टक्केवारी ८२.९५ टक्के असून वर्धा तालुक्यात ८१.८४ आर्वी तालुक्यातील ८९.१८ टक्के शेतकºयांकडून जमिनी महामार्गासाठी घेण्यात आल्या आहे. या शेतकºयांना ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. समृद्धीबाबत संभ्रमावस्था असल्याने सुरुवातीला जमीन देण्यास शेतकºयांनी नकार दिला होता. मोबदल्यामुळे हा विरोध मावळल्याचे आता चित्र आहे.सर्वाधिक गावे सेलू तालुक्यातीलमहाराष्ट्र समृद्धी महामार्गात सेलू तालुक्यातून सर्वाधिक १६ गावातून जमीन अधिग्रहणाचे काम करण्यात आले. वर्धा तालुक्यातून १० तर आर्वी तालुक्यातून ८ गावातील शेतकºयांकडून जमिनी महामार्गासाठी घेण्यात आल्या. वर्धा तालुक्यातून २३.९०० कि़मी. सेलू तालुक्यातून २५.१६० तर आर्वी तालुक्यातून ११.६७० कि़मी.तून हा समृद्धी महामार्ग जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग