शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

७२ गावे पाणीदार करण्यासाठी लागले असंख्य हात

By admin | Updated: April 11, 2017 01:13 IST

जीवन म्हणजेच पाणी. पाणीच उरणार नाही तर पृथ्वीतलावरील जीवनमान धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.

ग्रामस्थांचा पुढाकार : अनेक सामाजिक संघटनाही सरसावल्याराजेश भोजेकर वर्धाजीवन म्हणजेच पाणी. पाणीच उरणार नाही तर पृथ्वीतलावरील जीवनमान धोक्यात आल्यावाचून राहणार नाही. उशिरा का होईना हेच पाणी वाचविण्यासाठी चळवळी उभ्या होत आहेत. याचाच प्रत्यय आर्वी तालुक्यातील तब्बल ७२ गावांमध्ये येत आहे. निमित्त आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या अभियानाचे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी आर्वी तालुक्यातील ७२ गावांमध्ये हजारो हात निस्वार्थ भावनेने पाण्यासाठी श्रमदानात गुंतले आहे. हे दृश्य ‘साथी हात बढाना..एक अकेला थक जाये तो मिलकर बोझ उठाना...’ या गीताचे स्मरण करून देत आहे. अभिनेते अमिर खान, सत्यमेव जयतेचे सत्यजीत भटकळ व डॉ. अविनाश पोळ यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे अभियान हाती घेतले आहे. या अनुषंगाने मागील वर्षी वॉटर कॅप-१ स्पर्धेचे ३ तालुक्यात यशस्वी आयोजन केले. यंदा वॉटर कॅप-२ मध्ये जलसंधारणासाठी महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांमधील २०१४ गावांची निवड झाली. गावातील ग्रामसभेत ठराव घेऊन या स्पर्धेत भाग घेतला आहे. या गावांतील प्रत्येकी पाच प्रतिनिधींना चार दिवसांचे प्रशिक्षण पाणी फांऊडेशनतर्फे ८४ केंद्रांवर देण्यात आले. त्यांच्या सल्ल्याने पाणलोट व्यवस्थापन आराखडा तयार करून गावाच्या सर्व लोकांना सहभागी करुन श्रमदान व स्वावलंबनाने जलसंधारण कार्य सुरू आहे.आर्वी तालुक्यातील १३० पैकी ७२ गावांची निवडवर्धा : वॉटर कॅप-२ या स्पर्धेसाठी आर्वी तालुक्यातील १३० पैकी तब्बल ७२ गावांची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला स्पर्धेमागील भूमिका या गावांना समजावून सांगण्यात अडचणी आल्या. ही केवळ स्पर्धा नाही, तर पाण्याचे महत्त्वही त्यांना समजाविण्यात आले. पाणी नसल्यामुळे आडातपाडात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. भविष्यात कोरडा दुष्काळ कायमस्वरूपी पडला, तर पाणी पाणी करत जीवन संपेल, हे दिवस यायला वेळ लागणार नाही. ही गंभीर बाब या निमित्ताने गावकऱ्यांना समजाविण्यात यश आले. यानंतर आर्वी तालुक्यातील ७२ हा गावांतून असंख्य महिला-पुरुषांचे हात जलसंधारणाच्या कामाला लागली आहे. ही स्पर्धा असली तरी यामुळे ही गावे पाणीदार होणार आहे. हे लक्षात येताच काही सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. यामध्ये भारतीय जैन संघटना, जनहीत मंच, युवा सोशल फोरम या संघटनांसोबतच वर्धेतील हनुमान टेकडीवर जलसंधारणाचे ‘मॉडेल’ उभी करणारी वैद्यकीय जनजागृती मंच ही संघटनाही या कामात सरसावली आहे. माळेगाव (ठेका) येथे सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंकित जयस्वाल, प्रिया बाळसराफ, हर्षवर्धन बानोकर, हिमांशू लोहकरे विद्यार्थ्यांसह व गावातील काही युवकांनी गावकऱ्यांना या स्पर्धेचे महत्त्व पटवून देण्याची मोलाची कामगिरी बजावली. माळेगाव(ठेका) या गावात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या समाजोत्थनाच्या कार्यात या गावांना प्रत्येकी पाच दिवस जलसंधारणाच्या कार्यासाठी भारतीय जैन संघटना जेसीबी वा पोकलेन मशीन पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सहयोग करण्याचे आवाहनही भारतीय जैन संघटनेने केले आहे.अनेक संघटना सरसावणार८ एप्रिल ते २२ मे अशी ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड झालेल्या आर्वी तालुक्यातील ७२ गावांना पाणीदार करण्यासाठी पुन्हा काही स्वयंसेवी व सामाजिक संघटना जुळणार असल्याचे बोलले जात आहे. श्रमदानातून दिवसागणिक असंख्य हात लागत असल्यामुळे आर्वी तालुक्यातील ७२ गावांमध्ये सुरू असलेल्या चळवळीला चांगलीच गती आली आहे.अन् जिल्हाधिकाऱ्यांनीही केले श्रमदानआर्वी तालुक्यातील माळेगाव(ठेका) या गावाचीही वॉटर कॅप-२ स्पर्धेसाठी निवड झाली. या गावांत श्रमदानात असंख्य हात लागले. या कामांची पाहणी करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे सोमवारी सकाळीच पोहचले. प्रत्येकजण कामात गुंतला असल्याचे पाहून त्यांनाही राहवले नाही. त्यांनीही कुदळ घेत श्रमदान केले.