शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

वर्धा जिल्ह्यातील ७० टक्के जलाशयांत पाणी ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 13:52 IST

वर्धा जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांनंतर बोर प्रकल्पाची तीन दारे खुली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपल्बध झाला असून तब्बल पाच जलाशये १०० टक्के भरली आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी देखील सध्या अतिपावसाच्या रिपरिपीने चिंतातूर झाला आहे. जूनमध्ये पावसाने उसंत घेतली असल्याने कापूस , सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. तर काहींची पीके मृतावस्थेत गेली होती. मात्र, मागील १५ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसाने अनेक दिवस नागरिकांना सुर्यदर्शनही झाले नाही. अशातच अंकुरलेल्या पिकांवर रोगाचे देखील सावट आले आहे. सोबतच नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

मागील अनेक वर्षानंतर बोलधरण जलाशय ८६.६० टक्के भरले आहे. बोर धरणाची पाणी पातळी ३३०.४० मीटर ऐवढी असून त्यापैकी आता ३२८.९० एवढ्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील मोठ्या जलाशयांपैकी धामनदी प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, वर्धा कारनदी प्रकल्प ही सहा मोठी जलाशये शंभर टक्के भरली आहेत. शेतकऱ्यांना रब्बी पीके घेताना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक भागात पाणी पातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा समाना करावा लागणार नसून यावर्षी उन्हाळयात पाण्याचे चटके सहन करावे लागणार नसल्याचे चित्र आहे.

आपत्ती व्यवस्थापन समिती सज्जमागील काही वर्षांपूर्वी बैल पोळ्याच्या दिवशी बोरधरण प्रकल्पाच्या काही कर्मचाऱ्यांच्या अनावधानाने बोर जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पुरपरिस्थिती निर्माण झाली होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती न होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती युद्धस्तरावर काम करण्यासाठी यावेळी सज्ज होती.

१० मध्यम जलाशयांत १०० टक्के पाणीसाठावर्धा जिल्ह्यात २० मध्यम जलाशये असून त्यापैकी कवाडी, लहादेवी, अंबाझरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा, आष्टी, परसोडी आणि हराशी हे तब्बल १० मध्यम जलाशये १०० टक्के भरले आहेत. तर टकाळी (बोरखेडी), मलकापूर, पिलापूर, उमरी ही चार जलाशये शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण