शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
4
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
5
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
6
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
7
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
8
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
9
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
11
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
12
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
13
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
14
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
15
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
16
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
17
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
18
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
19
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
20
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

वर्धा जिल्ह्यातील ७० टक्के जलाशयांत पाणी ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 13:52 IST

वर्धा जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांनंतर बोर प्रकल्पाची तीन दारे खुली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपल्बध झाला असून तब्बल पाच जलाशये १०० टक्के भरली आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी देखील सध्या अतिपावसाच्या रिपरिपीने चिंतातूर झाला आहे. जूनमध्ये पावसाने उसंत घेतली असल्याने कापूस , सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. तर काहींची पीके मृतावस्थेत गेली होती. मात्र, मागील १५ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसाने अनेक दिवस नागरिकांना सुर्यदर्शनही झाले नाही. अशातच अंकुरलेल्या पिकांवर रोगाचे देखील सावट आले आहे. सोबतच नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

मागील अनेक वर्षानंतर बोलधरण जलाशय ८६.६० टक्के भरले आहे. बोर धरणाची पाणी पातळी ३३०.४० मीटर ऐवढी असून त्यापैकी आता ३२८.९० एवढ्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील मोठ्या जलाशयांपैकी धामनदी प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, वर्धा कारनदी प्रकल्प ही सहा मोठी जलाशये शंभर टक्के भरली आहेत. शेतकऱ्यांना रब्बी पीके घेताना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक भागात पाणी पातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा समाना करावा लागणार नसून यावर्षी उन्हाळयात पाण्याचे चटके सहन करावे लागणार नसल्याचे चित्र आहे.

आपत्ती व्यवस्थापन समिती सज्जमागील काही वर्षांपूर्वी बैल पोळ्याच्या दिवशी बोरधरण प्रकल्पाच्या काही कर्मचाऱ्यांच्या अनावधानाने बोर जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पुरपरिस्थिती निर्माण झाली होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती न होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती युद्धस्तरावर काम करण्यासाठी यावेळी सज्ज होती.

१० मध्यम जलाशयांत १०० टक्के पाणीसाठावर्धा जिल्ह्यात २० मध्यम जलाशये असून त्यापैकी कवाडी, लहादेवी, अंबाझरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा, आष्टी, परसोडी आणि हराशी हे तब्बल १० मध्यम जलाशये १०० टक्के भरले आहेत. तर टकाळी (बोरखेडी), मलकापूर, पिलापूर, उमरी ही चार जलाशये शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण