शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

५०० शेतकऱ्यांना होणार सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:10 IST

जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे  काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल. 

ठळक मुद्देदहेगाव (गोंडी) कालवा दुरुस्तीचे काम सुरू :•६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे  काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल. दहेगाव गोंडी येथे लघुसिंचन तलाव आहे. या तलावातून सिंचनासाठी ७ किलोमीटरचा मुख्य कालवा, तसेच ५.२० किलोमीटरचा एक  आणि दीड किलोमीटरचे २ असे तीन लघुकालवे आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून कालव्यांच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्यामुळे कालव्यामध्ये झाडे वाढली होती. मातीने कालवे बुजले होते. परिणामी, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नव्हते.  त्यामुळे तलावातून अपेक्षित सिंचन होऊ शकत नव्हते. मागील ५ वर्षांत या तलावातून केवळ ८० हेक्टर सिंचन झाले आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी   गावकºयांकडून वारंवार केली जात  होती. कालव्याची दुरुस्ती आणि गाळ उपसण्याचे काम  जलयुक्त शिवारमधून करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेऊन प्रस्तावाला मंजुरी दिली.दहेगाव गोंडी  येथील तलावाच्या  कालव्याचे दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले. या कालव्याच्या दुरुस्तीमुळे काचनूर, खरांगणा, कासारखेडा, मासोद या गावातील सुमारे ५०० शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था तयार करावी आणि त्यासाठी अविरोध निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच गुरे असणाºया  शेतकऱ्यांनी चा-यासाठी मक्याची लागवड करावी. कालव्याचे काम १५ दिवसांत पूर्ण होऊन  चारा लागवडीसाठीसुद्धा तलावाच्या पाण्याचा वापर करता येईल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तत्काळ मागणी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. अशा पद्धतीच्या कालवा दुरुस्ती कामाचे प्रस्ताव कुऱ्हा, टेंभरी, हराशी या गावांसाठीसुद्धा तयार केले आहेत. त्याला मान्यता मिळाल्यावर तेथील कामसुद्धा सुरू करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता काळे आणि आवीर्चे उपअभियंता राजीव दामोधरे यांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी