शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

५०० शेतकऱ्यांना होणार सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:10 IST

जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे  काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल. 

ठळक मुद्देदहेगाव (गोंडी) कालवा दुरुस्तीचे काम सुरू :•६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे  काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल. दहेगाव गोंडी येथे लघुसिंचन तलाव आहे. या तलावातून सिंचनासाठी ७ किलोमीटरचा मुख्य कालवा, तसेच ५.२० किलोमीटरचा एक  आणि दीड किलोमीटरचे २ असे तीन लघुकालवे आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून कालव्यांच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्यामुळे कालव्यामध्ये झाडे वाढली होती. मातीने कालवे बुजले होते. परिणामी, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नव्हते.  त्यामुळे तलावातून अपेक्षित सिंचन होऊ शकत नव्हते. मागील ५ वर्षांत या तलावातून केवळ ८० हेक्टर सिंचन झाले आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी   गावकºयांकडून वारंवार केली जात  होती. कालव्याची दुरुस्ती आणि गाळ उपसण्याचे काम  जलयुक्त शिवारमधून करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेऊन प्रस्तावाला मंजुरी दिली.दहेगाव गोंडी  येथील तलावाच्या  कालव्याचे दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले. या कालव्याच्या दुरुस्तीमुळे काचनूर, खरांगणा, कासारखेडा, मासोद या गावातील सुमारे ५०० शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था तयार करावी आणि त्यासाठी अविरोध निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच गुरे असणाºया  शेतकऱ्यांनी चा-यासाठी मक्याची लागवड करावी. कालव्याचे काम १५ दिवसांत पूर्ण होऊन  चारा लागवडीसाठीसुद्धा तलावाच्या पाण्याचा वापर करता येईल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तत्काळ मागणी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. अशा पद्धतीच्या कालवा दुरुस्ती कामाचे प्रस्ताव कुऱ्हा, टेंभरी, हराशी या गावांसाठीसुद्धा तयार केले आहेत. त्याला मान्यता मिळाल्यावर तेथील कामसुद्धा सुरू करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता काळे आणि आवीर्चे उपअभियंता राजीव दामोधरे यांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी