शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

४५८ कृषी केंद्रांची झाली तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यंदा २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हेक्टवर सोयाबीन, ६५ हजार हेक्टरवर तूर, १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ हजार २०० हेक्टरवर भुईमुंग, ८०० हेक्टरवर मुंग, ९०० हेक्टरवर उडिद तर १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. शिवाय त्यासाठी बियाणे आणि खताचा मुबलक प्रमाणात साठा बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देबोगस बियाण्यांना ब्रेक लावण्यासाठी प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. शिवाय विविध बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील केल्या असल्या तरी कुठल्याही परिस्थितीत बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने कंबर कसली असून २ जून पर्यंत जिल्ह्यातील ४५८ कृषी केंद्राची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.जिल्ह्यात यंदा २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हेक्टवर सोयाबीन, ६५ हजार हेक्टरवर तूर, १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ हजार २०० हेक्टरवर भुईमुंग, ८०० हेक्टरवर मुंग, ९०० हेक्टरवर उडिद तर १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. शिवाय त्यासाठी बियाणे आणि खताचा मुबलक प्रमाणात साठा बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. सध्या बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकरी गर्दी करीत आहे. याच बियाणे खरेदीदरम्यान बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाकडून एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकासह कृषी विभागाच्या अधिकाºयांनी आतापर्यंत ४५८ कृषी केंद्रांवर छापा टाकून दुकानांची तपासणी केली आहे. शिवाय ही तपासणी मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.गिरड अन् हिंगणघाटात आढळले बोगस बियाणेगोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून गिरड येथील एका दुकानातून कपाशीचे ३ किलो बियाणे आणि हिंगणघाट येथील एका दुकानातून कपाशीचे दहा पाकिट बियाणे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. हे बियाणे बोगस आहे काय याची शहानिशा करण्यासाठी त्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत २७ मे रोजी पाठविण्यात आले आहे. पण अद्यापही प्रयोगशाळेचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालेला नाही.जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्रवर्धा जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. त्यापैकी ४५८ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तर उर्वरित कृषी केंद्राची तपासणी येत्या दोन ते तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या अधिकाऱ्यांना करावी लागेल तक्रारकपाशीच्या बियाण्यांबाबत काही तक्रारी असल्यास शेतकºयांना उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे त्याची तक्रार करता येणार आहे. तर तूर, सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांना ती तालुका कृषी अधिकारी किंवा पं.स. कृषी विभागाकडे करता येणार आहे.गिरड व हिंगणघाट येथून जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. लवकरच आम्हाला अहवाल प्राप्त होईल अशी अशा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कृषी केंद्र चालकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून बियाणे, खत व औषधींची विक्री करावी. शिवाय बियाण्यांबाबत काही अडचणी असल्यास कृषी विभागाकडे शेतकºयांनी तक्रारी कराव्या. वेळीच तक्रारीची दखल घेतली जाईल.- अनील इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार