शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

जिल्ह्यातील ४३६ शाळा संरक्षक भिंतीविना ! शाळेत भौतिक सुविधांचाही अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:33 IST

टप्प्याटप्प्यात होणार काम : ४२ शाळांत कामाला मंजुरी, वर्षभरात होणार पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची जडणघडण व शैक्षणिक विकास जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत असतो. मात्र, बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या भौतिक सुविधांचा अभाव आहे. जिल्ह्यातील तब्चल ४३६ शाळांना अद्यापही संरक्षक भिंती नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षण विभागाच्या धोरणानुसार भौतिक सुविधांचे १० घटक आहेत. सदर १० घटकांनुसार प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. बहुतांश शाळांमध्ये या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्धा जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्याच्या आठ तालुक्यांत शाळांची संख्या शेकडोच्या घरात आहे. या शाळेतून शिक्षण घेत मोठ्चा हुद्द्यावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बदलत्या स्थितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकताहेत हे खरे असले तरी, त्यांची गती मात्र कमी असल्याचे दिसून येते.

डीपीडीसीच्या निधीतून होणार संरक्षक भिंतीजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांना संरक्षक भिंती बांधकामासाठी शाळेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. याची संख्या ४३६ एवढी होती. मात्र शासनाकडून संरक्षक भिंतीसाठी निथी मिळाला नसल्याने ही कामे डीपीडीसीच्या निधीतून करण्यात येणार आहेत. टप्प्याटप्यात ही कामे होणार असून यंदा ४२ कामे केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

ठराविक निधीतून कामेशाळांच्या संरक्षक भिंतीसाठी डीपीडीसीकडून निधी देण्यात आला आहे. मात्र हा निधी तोकडा पडत असल्याने यात जिल्ह्यात संरक्षक भिंतीसाठी प्रस्ताव पाठविणाऱ्या शाळांपैकी १०० मीटर पर्यंत कामे असणाऱ्या शाळांना प्राधान्य दिले गेले आहे. त्यापेक्षा अधिक कामे लांबी असलेल्या शाळांना प्रतीक्षा यादीत ठेवले असून निधी प्राप्त होताच त्या शाळेतील कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंजुरी मिळालेल्या शाळेतील संरक्षण भिंतीसाठी बांधकाम विभागाकडे कामे देण्यात आली आहे. वर्षभरात कामे पूर्ण केली जाणार आहे.

५ वर्षात २३४ शाळांच्या सरंक्षक भिंतीची झाली कामेजिल्ह्यातील शाळांना संरक्षक भिंतीची कामे पूर्ण करण्यासाठी सन २०१९-२० पासून सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत २३४ शाळांच्या भिंतीची कामे करण्यात आली आहेत.

वर्षनिहाय केलेली कामे२०१९-२० : १५३२०२०-२१ : ०४२०२१-२२ : ७७२०२४-२५ : ४३

"शाळेतील सुरक्षा भिंतीची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव ठेवला होता. प्रस्तावित शाळांपैकी ४२ शाळांच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही कामे पूर्ण केली जाणार आहेत."- डॉ. नितू गावंडे, शिक्षणाधिकारी, वर्धा 

टॅग्स :wardha-acवर्धाzp schoolजिल्हा परिषद शाळा