शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

जिल्ह्यातील ४३६ शाळा संरक्षक भिंतीविना ! शाळेत भौतिक सुविधांचाही अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:33 IST

टप्प्याटप्प्यात होणार काम : ४२ शाळांत कामाला मंजुरी, वर्षभरात होणार पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची जडणघडण व शैक्षणिक विकास जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत असतो. मात्र, बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या भौतिक सुविधांचा अभाव आहे. जिल्ह्यातील तब्चल ४३६ शाळांना अद्यापही संरक्षक भिंती नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षण विभागाच्या धोरणानुसार भौतिक सुविधांचे १० घटक आहेत. सदर १० घटकांनुसार प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. बहुतांश शाळांमध्ये या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्धा जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्याच्या आठ तालुक्यांत शाळांची संख्या शेकडोच्या घरात आहे. या शाळेतून शिक्षण घेत मोठ्चा हुद्द्यावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बदलत्या स्थितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकताहेत हे खरे असले तरी, त्यांची गती मात्र कमी असल्याचे दिसून येते.

डीपीडीसीच्या निधीतून होणार संरक्षक भिंतीजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांना संरक्षक भिंती बांधकामासाठी शाळेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. याची संख्या ४३६ एवढी होती. मात्र शासनाकडून संरक्षक भिंतीसाठी निथी मिळाला नसल्याने ही कामे डीपीडीसीच्या निधीतून करण्यात येणार आहेत. टप्प्याटप्यात ही कामे होणार असून यंदा ४२ कामे केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

ठराविक निधीतून कामेशाळांच्या संरक्षक भिंतीसाठी डीपीडीसीकडून निधी देण्यात आला आहे. मात्र हा निधी तोकडा पडत असल्याने यात जिल्ह्यात संरक्षक भिंतीसाठी प्रस्ताव पाठविणाऱ्या शाळांपैकी १०० मीटर पर्यंत कामे असणाऱ्या शाळांना प्राधान्य दिले गेले आहे. त्यापेक्षा अधिक कामे लांबी असलेल्या शाळांना प्रतीक्षा यादीत ठेवले असून निधी प्राप्त होताच त्या शाळेतील कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंजुरी मिळालेल्या शाळेतील संरक्षण भिंतीसाठी बांधकाम विभागाकडे कामे देण्यात आली आहे. वर्षभरात कामे पूर्ण केली जाणार आहे.

५ वर्षात २३४ शाळांच्या सरंक्षक भिंतीची झाली कामेजिल्ह्यातील शाळांना संरक्षक भिंतीची कामे पूर्ण करण्यासाठी सन २०१९-२० पासून सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत २३४ शाळांच्या भिंतीची कामे करण्यात आली आहेत.

वर्षनिहाय केलेली कामे२०१९-२० : १५३२०२०-२१ : ०४२०२१-२२ : ७७२०२४-२५ : ४३

"शाळेतील सुरक्षा भिंतीची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव ठेवला होता. प्रस्तावित शाळांपैकी ४२ शाळांच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही कामे पूर्ण केली जाणार आहेत."- डॉ. नितू गावंडे, शिक्षणाधिकारी, वर्धा 

टॅग्स :wardha-acवर्धाzp schoolजिल्हा परिषद शाळा