शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

४१,६११ सेट टॉप बॉक्स कार्यान्वित

By admin | Updated: May 25, 2017 00:57 IST

शासनाकडून केबल टीव्हीचे डिजीटलायझेशन करण्यात आले आहे. मोठ्या शहरांतील केबल टीव्ही अ‍ॅनालॉग पद्धत कधीचीच बंद झाली असून सेट टॉप बॉक्स लागले आहेत; ...

किमतीबाबत संभ्रम कायमच : केबल वितरकांकडून ग्राहकांची लूटलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून केबल टीव्हीचे डिजीटलायझेशन करण्यात आले आहे. मोठ्या शहरांतील केबल टीव्ही अ‍ॅनालॉग पद्धत कधीचीच बंद झाली असून सेट टॉप बॉक्स लागले आहेत; पण वर्धा जिल्ह्यात अद्याप ते लागलेले नव्हते. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही आता कुठे जिल्ह्यातील ४१ हजार ६११ घरांमध्ये सेट टॉप बॉक्स पोहोचले आहेत. केबलचे अ‍ॅनालॉग प्रसारण बंद करण्याच्या आदेशामुळे सेट टॉप बॉक्स लागू शकले आहेत.वर्धा जिल्ह्यात २४७ नोंदणीकृत केबल वितरकांची नोंद आहे. या वितरकांकडून अन्य वॉर्ड, गावात सबवितरक नेमण्यात आलेले आहेत. त्यांची शासन दरबारी नोंद नसल्याचे सांगितले जाते. या वितरकांद्वारे केबल टीव्हीचे जिल्ह्यात ४५ हजार ८३७ ग्राहक असल्याचे दाखविण्यात आले आहे. यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात कुठेही सेट टॉप बॉक्स बसविण्यात आलेले नव्हते. तिसऱ्या टप्प्यामध्ये शहरी भागातील ३१ हजार २ पैकी ३० हजार ९९५ घरांमध्ये सेट टॉप बॉक्स लावण्यात आलेत. ग्रामीण भागातील १४ हजार ८३६ पैकी १० हजार ६१६ घरांमध्ये चौथ्या टप्प्यामध्ये सेट टॉप बॉक्स लावण्यात आले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ४१ हजार ६११ घरांमध्ये सेट टॉप बॉक्स लावण्यात आले असून ४ हजार २२६ घरांमध्ये अद्यापही सेट टॉप बॉक्स लावायचे असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व टीव्ही धारकांकडे सेट टॉप बॉक्स लागावेत म्हणून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत अ‍ॅनालॉग प्रसारण बंद करण्याच्या सूचना करमणूक कर विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या जिल्ह्यातील अ‍ॅनालॉग प्रसारण बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.केबल वितरकांना ग्राहकांच्या संख्येनुसार कर जिल्हा प्रशासनाला अदा करावा लागतो. यामुळे ग्राहकांची संख्या कमी सांगण्याचे प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू आहे. हा प्रकार करमणूक कर चुकविण्याकरिता केला जात असल्याचे समोर आले आहे. यात केबल वितरकांनी कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला आहे. वितरकांकडून भरण्यात येणारा कर आणि शासनाकडे असलेले ग्राहकांचे आकडे पाहता दहा लाखांवर लोकसंख्या असलेल्या वर्धा जिल्ह्यात केबल टीव्ही असलेली ४५ हजारच घरे कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही टक्के नागरिक खासगी डीश टीव्हीचा वापर करीत असले तरी ते प्रमाण कमी आहे. यामुळेच खरी ग्राहक संख्या माहिती करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले. यात वाढीव ग्राहक आढळून आल्याने दंडही आकारण्यात आला; पण सेट टॉप बॉक्समध्ये पुन्हा तो कित्ता गिरविला जात असल्याचे दिसते. यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा एकदा सर्वेक्षण करून खरी ग्राहक संख्या नोंदविणे गरजेचे झाले आहे. यातून मागील काही वर्षांत किती कर बुडविण्यात आला, हे देखील स्पष्ट होऊ शकणार आहे. अवाढव्य किमतीमुळे ग्राहकांत संतापसेट टॉप बॉक्स लावण्यासाठी जिल्ह्यात केबल वितरक वेगवेगळी रक्कम आकारत आहेत. काही ठिकाणी १५०० ते १७०० रुपये तर कुठे २००० रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात आहे. वास्तविक, सेट टॉप बॉक्स प्रसारण कंपनीला ५०० ते ८०० रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. यावर इन्स्टॉलेशन चार्जेस आकारून १२५० रुपयांत ते केबल वितरकांना दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वितरक १५०० ते २००० रुपयांपर्यंत रक्कम आकारत आहे. शिवाय महिन्याचे भाडेही वाढविण्यात आले आहे. यामुळे मोठी लूट होत असल्याची ओरड आहे. प्रशासकीय नियंत्रण गरजेचेकेबल वितरकांवर करमणूक कर विभाग लक्ष ठेवून असला तरी गैरप्रकार काय असल्याचे दिसून येत आहे. सेट टॉप बॉक्सची किंमत ठरविण्यावर शासन, प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. यामुळे हा प्रकार घडत आहे. सेट टॉप बॉक्समध्ये ग्राहकांची होणारी लूट थांबविण्याकरिता शासन, प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.