३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:14+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ये-जा करणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा दूवाच ठरतो.

35 person took Lessons on how to avoid wildlife-human conflict | ३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे

३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे

ठळक मुद्देवनविभागाचा उपक्रम। उमरेड-पवनी-कºहांडलाची जाणली इत्थंभूत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. पण याच व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेला लागून असलेल्या गाव शिवारात नेहमीच मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष होतात. हाच अनुचित प्रकार टाळता यावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेवरील गावांमधील काही निवडक नागरिकांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उमरेड-पवनी-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या गावांत भेट देऊन वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष माहिती घेतली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ये-जा करणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा दूवाच ठरतो. याच परिसरात वन्यजीव आणि मानव संघर्ष टळण्यासाठी ग्राम परिस्थितीकी विकास समिती अंतर्गत विविध प्रकारचे कामे करण्यात आली आहेत. ती अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. या अभ्यास दौऱ्यात वर्धा जिल्ह्यातील सदर ३५ व्यक्तींनी तेथील मनोरा गाव येथील रेशीम उद्योग, सोलरकुंपन, जीम, गांडूळ खत प्रकल्प, १०० टक्के कुºहाड बंदी, १०० टक्के एलपीजी वितरण, गावांमधील बोलक्या भिंती, सौर कंदील आदी कामांची माहिती जाणून घेतली. शिवाय वन्यजीव संगोपनासाठी नेहमीच सहकार्य करू अशी शपथ घेतली. अभ्यास दौऱ्यासाठी गेलेली चमू शुक्रवारी रात्री वर्धेत परतली.

अभ्यास दौऱ्यादरम्यान उमरेड-पवनी-कऱ्हांडला येथील सहाय्यक वनसंरक्षक अजीत साजणे, उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी निंबेकर, कुहीचे धनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक निलेश वाडीघरे यांनी वर्धा जिल्ह्यातून आलेल्या ३५ व्यक्तींना विविध विषयांची माहिती दिली. शिवाय वन्यजीवांचे महत्त्व पटवून दिले. या अभ्यास दौऱ्यादरम्यान वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या रानवाडी येथील २०० हेक्टरवरील गवत कुरण प्रकल्पाचीही माहीती देण्यात आली. वनविभागाने हा उपक्रम आयोजित केला होता.

Web Title: 35 person took Lessons on how to avoid wildlife-human conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.