शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वर्धा जिल्ह्यातील ३.४६ लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 15:29 IST

राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१० फेब्रुवारीपासून विशेष मोहीमकृमीदोष टाळण्यासाठीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात सुमारे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परिजीवी जंतूपासून धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात २ लाख २१ हजार ५८१ तर शहरी भागात १ लाख २५ हजार १९९ विद्यार्थी आहेत. त्यांना १० फेब्रुवारी रोजी या गोळ्या देण्यात येणार आहेत. निमशासकीय, नगर पालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी आदी ठिकाणी या गोळ्या आरोग्य विभागाच्यावतीने पोहोचविण्यात आल्या आहेत. या गोळ्या १ ते १९ वयोगटातील सर्वच बालकांना देण्यात येणार आहे. त्यापैकी १ ते २ वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर यावरील वयोगटातील बालकांना पूर्ण गोळी देण्यात येणार आहे.मुलांमध्ये वाढत असलेल्या कृमीदोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन व १५ फेब्रुवारीला मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे. या दोन दिवसात या गोळ्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.जिल्ह्यात ९१६ शासकीय शाळा, ९१ शासकीय अनुदानित शाळा, ९ नगर पालिकेच्या शाळा, १४६ खासगी अनुदानित शाळा, अशा एकूण ११६२ शाळा व १४४१ अंगणवाड्या आहेत. यातील सर्वच बालकांना गोळ्या देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शाळाबाह्य असलेल्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांमार्फत पार पाडण्यात येणार आहे.

मोहिमेतून कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वगळलेया मोहिमेतून आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण भागात असलेल्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना वगळल्याने या मोहिमेला भेदभावाचे गालबोट लागले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत केवळ शासकीय, खासगी अनुदानित व अंगणवाडीतील बालकांना गोळ्या देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला आहेत. बालकांसंदर्भात शासन भेदभाव करीत असून या निर्णयामुळे शासनाचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण होणार नसल्याचे दिसत आहे.

कृमी दोषामुळे रक्ताशय आणि कुपोषणबालकांमध्ये होणाऱ्या दीर्घकालीन कृमीदोषांमुळे रक्ताशय आणि कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बालक कमजोर होतात. शिवाय त्यांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचा धोका आहे. देशात ५ वर्षांखालील मुला-मुलींमध्ये रक्ताशयाचे प्रमाण ७० टक्के आहे. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के मुलांमध्ये रक्ताशय आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रात हे प्रमाण २९ टक्के आढळले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थी