शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान

By महेश सायखेडे | Updated: September 6, 2022 16:41 IST

जिल्हा प्रशासनाने पाठविला शासनाला प्रस्ताव

वर्धा : यंदाच्या वर्षी जून महिन्यांत पावसाने दडी मारली. पण जुलै अन् ऑगस्ट महिन्यांत सैराट झालेल्या वरुणराजाची वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोसळधार कायम राहिल्याने जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांत अतिवृष्टीची वेळोवेळी नोंद घेण्यात आली. याच अतिवृष्टीमुळे २.५४ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील उभ्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सर्वेक्षण व पंचनाम्यांअंती पुढे आले आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार ६४६ इतकी असून त्यांना नियमानुसार शासकीय मदत देण्यासाठी ३४५.९९ कोटींची गरज असून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. आता शासनाकडून निधी केव्हा वितरित होतो याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी समुद्रपूर तालुक्यात

वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील ३३ हजार ११, सेलू तालुक्यातील २७ हजार ३८६, देवळी तालुक्यातील ३० हजार ३४९, आर्वी तालुक्यातील २६ हजार ३९८, आष्टी तालुक्यातील १७ हजार ३८७, कारंजा तालुक्यातील २४ हजार ३, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ५३३ तर समुद्रपूर तालुक्यातील ३७ हजार ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

हिंगणघाट तालुक्यातील उभ्या पिकांचे सर्वाधिक नुकसान

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ५४ हजार ९४.४० हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील ४०६९३.३३ हेक्टर, सेलू तालुक्यातील २३९६३.७० हेक्टर, देवळी तालुक्यातील ३७२९३.६० हेक्टर, आर्वी तालुक्यातील ३००७५.७७ हेक्टर, आष्टी तालुक्यातील १५०५५ हेक्टर, कारंजा तालुक्यातील २६३४३.३८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यातील ४५५८७.५२ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यातील ३५०८२.१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

वाढीव दराप्रमाणे अपेक्षित तालुकानिहाय निधीवर्धा : ५५,५०,३७,२८८ रुपयेसेलू : ३२,६०,५७,२९६ रुपयेदेवळी : ५०,७२,२८,८०० रुपयेआर्वी : ४१,०१,४२,०९२ रुपयेआष्टी : २०,५२,८५,६०० रुपयेकारंजा : ३५,८२,६९,९६८ रुपयेहिंगणघाट : ६२,०८,२१,७४४ रुपयेसमुद्रपूर : ४७,७१,१६,५६० रुपये   

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी