शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान

By महेश सायखेडे | Updated: September 6, 2022 16:41 IST

जिल्हा प्रशासनाने पाठविला शासनाला प्रस्ताव

वर्धा : यंदाच्या वर्षी जून महिन्यांत पावसाने दडी मारली. पण जुलै अन् ऑगस्ट महिन्यांत सैराट झालेल्या वरुणराजाची वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोसळधार कायम राहिल्याने जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांत अतिवृष्टीची वेळोवेळी नोंद घेण्यात आली. याच अतिवृष्टीमुळे २.५४ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील उभ्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सर्वेक्षण व पंचनाम्यांअंती पुढे आले आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार ६४६ इतकी असून त्यांना नियमानुसार शासकीय मदत देण्यासाठी ३४५.९९ कोटींची गरज असून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. आता शासनाकडून निधी केव्हा वितरित होतो याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी समुद्रपूर तालुक्यात

वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील ३३ हजार ११, सेलू तालुक्यातील २७ हजार ३८६, देवळी तालुक्यातील ३० हजार ३४९, आर्वी तालुक्यातील २६ हजार ३९८, आष्टी तालुक्यातील १७ हजार ३८७, कारंजा तालुक्यातील २४ हजार ३, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ५३३ तर समुद्रपूर तालुक्यातील ३७ हजार ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

हिंगणघाट तालुक्यातील उभ्या पिकांचे सर्वाधिक नुकसान

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ५४ हजार ९४.४० हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील ४०६९३.३३ हेक्टर, सेलू तालुक्यातील २३९६३.७० हेक्टर, देवळी तालुक्यातील ३७२९३.६० हेक्टर, आर्वी तालुक्यातील ३००७५.७७ हेक्टर, आष्टी तालुक्यातील १५०५५ हेक्टर, कारंजा तालुक्यातील २६३४३.३८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यातील ४५५८७.५२ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यातील ३५०८२.१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

वाढीव दराप्रमाणे अपेक्षित तालुकानिहाय निधीवर्धा : ५५,५०,३७,२८८ रुपयेसेलू : ३२,६०,५७,२९६ रुपयेदेवळी : ५०,७२,२८,८०० रुपयेआर्वी : ४१,०१,४२,०९२ रुपयेआष्टी : २०,५२,८५,६०० रुपयेकारंजा : ३५,८२,६९,९६८ रुपयेहिंगणघाट : ६२,०८,२१,७४४ रुपयेसमुद्रपूर : ४७,७१,१६,५६० रुपये   

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी