शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

भोंग्यावरून तापलं वातावरण; वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, ३२० गुन्हेगार ७ दिवसांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 15:58 IST

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरणात भूकंप आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे.

ठळक मुद्देआगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची कारवाई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर, सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

वर्धा : धार्मिक स्थळांवरील भाेंग्यावरुन राजकीय वातावरण तापत चालले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. आगामी सण, उत्सव काळादरम्यान शहरासह जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यातील तब्बल ३२० सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून ७ दिवसांसाठी तडीपार केल्याची माहिती आहे.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरणात भूकंप आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील ठाणेदारांना पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन करुन तशा सूचनाही देण्यात आलेल्या असल्याची माहिती आहे. मागील वर्षी पोलीस विभागाने २०० गुन्हेगारांना हद्दपार केले होते. आगामी रमजान ईद या सणानिमित्त सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये, म्हणून पोलीस विभागाने तब्बल ३२० सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते. उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी गुन्हेगारांना १ ते ७ मे या सात दिवसांसाठी हद्दपार केले आहे.

अटकेची तरतूद..

कलम १४४ या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अटक करु शकतात. कलम १०७ किंवा कलम १५१ अन्वये अटक करता येते. कलम १४४ नुसार वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.

सायबर पोलिसांचाही ‘वॉच’

भोंगे वाजविण्यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर सेल लक्ष ठेवून आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील सायबर सेलमधील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

उपविभागनिहाय करण्यात आलेली हद्दपारीची कारवाई

उपविभाग हद्दपार आरोपी

वर्धा             ११०

हिंगणघाट ९०

आर्वी             ६०

पुलगाव             ६०

रेकॉर्डवरील गुन्हेगार ‘रडार’वर

सामाजिक शांतता भंग होऊ नये, म्हणून पोलीस विभागाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करुन त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. उपविभागीय महसूल अधिकारी त्या प्रस्तावांची पडताळणी करुन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देतात.

जिल्ह्यात सामाजिक शांतता भंग होऊ नये, तसेच सण उत्सव काळात गालबोट लागू नये, म्हणून जिल्ह्यातील ३२० गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. नागरिकांनी आगामी सण, उत्सव काळात शांतता टिकवून ठेवावी, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

-यशवंत सोळंकी, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwardha-acवर्धा