शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

भोंग्यावरून तापलं वातावरण; वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, ३२० गुन्हेगार ७ दिवसांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 15:58 IST

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरणात भूकंप आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे.

ठळक मुद्देआगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची कारवाई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर, सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

वर्धा : धार्मिक स्थळांवरील भाेंग्यावरुन राजकीय वातावरण तापत चालले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. आगामी सण, उत्सव काळादरम्यान शहरासह जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यातील तब्बल ३२० सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून ७ दिवसांसाठी तडीपार केल्याची माहिती आहे.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरणात भूकंप आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील ठाणेदारांना पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन करुन तशा सूचनाही देण्यात आलेल्या असल्याची माहिती आहे. मागील वर्षी पोलीस विभागाने २०० गुन्हेगारांना हद्दपार केले होते. आगामी रमजान ईद या सणानिमित्त सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये, म्हणून पोलीस विभागाने तब्बल ३२० सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते. उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी गुन्हेगारांना १ ते ७ मे या सात दिवसांसाठी हद्दपार केले आहे.

अटकेची तरतूद..

कलम १४४ या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अटक करु शकतात. कलम १०७ किंवा कलम १५१ अन्वये अटक करता येते. कलम १४४ नुसार वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.

सायबर पोलिसांचाही ‘वॉच’

भोंगे वाजविण्यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर सेल लक्ष ठेवून आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील सायबर सेलमधील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

उपविभागनिहाय करण्यात आलेली हद्दपारीची कारवाई

उपविभाग हद्दपार आरोपी

वर्धा             ११०

हिंगणघाट ९०

आर्वी             ६०

पुलगाव             ६०

रेकॉर्डवरील गुन्हेगार ‘रडार’वर

सामाजिक शांतता भंग होऊ नये, म्हणून पोलीस विभागाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करुन त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. उपविभागीय महसूल अधिकारी त्या प्रस्तावांची पडताळणी करुन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देतात.

जिल्ह्यात सामाजिक शांतता भंग होऊ नये, तसेच सण उत्सव काळात गालबोट लागू नये, म्हणून जिल्ह्यातील ३२० गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. नागरिकांनी आगामी सण, उत्सव काळात शांतता टिकवून ठेवावी, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

-यशवंत सोळंकी, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwardha-acवर्धा