शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांची तृष्णातृप्ती करणाऱ्या ‘धाम’त 29.85 दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

यंदा जिल्ह्यात मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू पाहत आहे. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडील कुलर सुरू केल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांत सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न झाल्यास नागरिकांना जलसंकटाचा तोंडच द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील काही गावांना जलसंकटाला सामारे जावे लागत असल्याचे वास्तव असले तरी महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील २० गावांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचाच ठरतो. सध्या या जलाशयात २९.८५ दलघमी जिवंत जलसाठा आहे. यंदा जिल्ह्यात मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू पाहत आहे. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडील कुलर सुरू केल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांत सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न झाल्यास नागरिकांना जलसंकटाचा तोंडच द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करण्याची गरज आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा न.प. प्रशासन करते उचल-    वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा नगरपालिका प्रशासनाच्यावतीने पाणी पुरवठा केला जातो. तर वर्धा शहराशेजारील गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. स्थानिक स्वराज्य संस्था असलेले वर्धा नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही पाणी उचल संस्था धाम नदीच्या येळाकेळी तसेच पवनार येथील नदीपात्रातून पाण्याची उचल करतात.

पिण्यासाठी मागणीनुसार सोडणार धाम प्रकल्पातून पाणी-    जिल्ह्यातील प्रत्येक मध्यम व मोठ्या जलाशयातील काही टक्के जलसाठा सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने जलाशयांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. तर आता पाणी वापर संस्थांच्या मागणीनुसारच जलाशयांमधून पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे.

सिंचनासाठी धाममधून सोडले २८.०३ दलघमी पाणी-    पावसाळ्याच्या दिवसांत १०० टक्के भरलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून यंदा सिंचनासाठी तब्बल २८.०३ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. ५९.४८५ दलघमी एकूण साठवण क्षमता असलेल्या या जलाशयात सद्यस्थितीत २९.८५ दलघमी जिवंत जलसाठा आहे. हाच जलसाठा उन्हाळ्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी