शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
5
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
6
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
7
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
8
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
9
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
10
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
11
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
12
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
13
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
14
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
16
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
17
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
18
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
19
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

वर्धेकरांची तृष्णातृप्ती करणाऱ्या ‘धाम’त 29.85 दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

यंदा जिल्ह्यात मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू पाहत आहे. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडील कुलर सुरू केल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांत सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न झाल्यास नागरिकांना जलसंकटाचा तोंडच द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील काही गावांना जलसंकटाला सामारे जावे लागत असल्याचे वास्तव असले तरी महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील २० गावांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचाच ठरतो. सध्या या जलाशयात २९.८५ दलघमी जिवंत जलसाठा आहे. यंदा जिल्ह्यात मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू पाहत आहे. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडील कुलर सुरू केल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांत सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न झाल्यास नागरिकांना जलसंकटाचा तोंडच द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करण्याची गरज आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा न.प. प्रशासन करते उचल-    वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा नगरपालिका प्रशासनाच्यावतीने पाणी पुरवठा केला जातो. तर वर्धा शहराशेजारील गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. स्थानिक स्वराज्य संस्था असलेले वर्धा नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही पाणी उचल संस्था धाम नदीच्या येळाकेळी तसेच पवनार येथील नदीपात्रातून पाण्याची उचल करतात.

पिण्यासाठी मागणीनुसार सोडणार धाम प्रकल्पातून पाणी-    जिल्ह्यातील प्रत्येक मध्यम व मोठ्या जलाशयातील काही टक्के जलसाठा सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने जलाशयांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. तर आता पाणी वापर संस्थांच्या मागणीनुसारच जलाशयांमधून पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे.

सिंचनासाठी धाममधून सोडले २८.०३ दलघमी पाणी-    पावसाळ्याच्या दिवसांत १०० टक्के भरलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून यंदा सिंचनासाठी तब्बल २८.०३ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. ५९.४८५ दलघमी एकूण साठवण क्षमता असलेल्या या जलाशयात सद्यस्थितीत २९.८५ दलघमी जिवंत जलसाठा आहे. हाच जलसाठा उन्हाळ्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी