शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

२७१ चातुर्मासिक कलश स्थापन; दिगंबर जैन बांधवांनी रचला नवा विक्रम

By महेश सायखेडे | Published: July 17, 2023 7:25 PM

महाराजांच्या निवासस्थळी होतेय कलश स्थापना

वर्धा : दिगंबर जैन समाज बांधवांचा चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मासाचे औचित्य साधून मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज वर्धा येथे असून, त्यांच्याच मार्गदर्शनात स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिरात १७० दिगंबर जैन कुटुंबीयांनी तब्बल २७१ चातुर्मासिक कलश स्थापन केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात चातुर्मासिक कलश स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ असून, तो सध्या एक विक्रम ठरला आहे.

जैन मुनी कधीच एका ठिकाणी राहत नाहीत; पण पावसाळ्याच्या दिवसांत म्हणजेच चातुर्मास काळात ते जैन धर्माच्या शिकवणीला केंद्रस्थानी ठेवून एकाच ठिकाणी थांबतात. वर्धा शहरात सध्या मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनात १७० दिगंबर जैन कुटुंबीयांनी चातुर्मासाच्या सुरुवातीला वंजारी चौक भागातील अनेकान्त स्वाध्याय मंदिरात २७१ चातुर्मासिक कलशांची स्थापना केली. विशेष म्हणजे मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज अनेकान्त स्वाध्याय मंदिरात चातुर्मासाचे औचित्य साधून थांबले आहेत.महाराजांच्या निवासस्थळी होतेय कलश स्थापनाचातुर्मासाचे औचित्य साधून ज्या ठिकाणी जैन मुनी राहतात, त्याच ठिकाणी जैन बांधव चातुर्मासिक कलश स्थापन करतात, तर चातुर्मास पूर्ण झाल्यावर हा कलश संबंधित कुटुंबाला दिला जात असल्याचे सांगण्यात आले.दोन्ही महाराजांनी केलीय सीमा निश्चितचातुर्मासचे औचित्य साधून करण्यात आलेल्या कलश स्थापनेदरम्यान मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज यांनी सीमा निश्चित केली आहे. मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज यांनी ७० ते ८० किमीची सीमा निश्चित केली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :wardha-acवर्धाJain Templeजैन मंदीर