चार महिन्यांत २४ पाण्याचे नमुने दूषित
By Admin | Updated: May 24, 2014 23:48 IST2014-05-24T23:48:45+5:302014-05-24T23:48:45+5:30
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या १३0 गावांची लोकसंख्या सन २0११ च्या सर्व्हेक्षणात १ लाख १६ हजार ७२७ एवढी नोंद झाली आहे. या संपूर्ण जनतेला शुद्ध निर्मळ आणि स्वच्छ

चार महिन्यांत २४ पाण्याचे नमुने दूषित
सेलू तालुक्यातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह प्रफुल्ल लुंगे - सेलू तालुक्यातील ६३ ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या १३0 गावांची लोकसंख्या सन २0११ च्या सर्व्हेक्षणात १ लाख १६ हजार ७२७ एवढी नोंद झाली आहे. या संपूर्ण जनतेला शुद्ध निर्मळ आणि स्वच्छ पाणी मिळावे या उदात्त हेतूने शासनाने विविध योजनेतून गावात ४५८ पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यात आले; मात्र यापैकी काही स्त्रोतांचे पाणी दूषित व आरोग्यास हानिकारक असल्याचा अहवाल आला. चार महिन्यात करण्यात आलेल्या तपासणीत तालुक्यातील तब्बल २४ पाण्याचे स्त्रोत दूषित असल्याचे समोर आले आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने तालुक्यातील ४५८ पाण्याच्या स्त्रोताचे नमुने तीन महिन्यातून एकदा तासण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या स्त्रोतामध्ये १६0 विहिरी, १९३ हातपंप, ७६ नळयोजनेच्या विहिरी, २९ हातपंप व काही विधंन विहिरींवरून गावकर्यांना पिण्याचे पाणी दिले जाते. तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हमदापूर, झडशी, दहेगाव गोसावी, सालई कला, सिंदी(रेल्वे) हे पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व या अंतर्गत २७ उपकेंद्र आहेत. या सर्व यंत्रणेमार्फत आरोग्याशी संबंधीत आजाराबरोबरच पिण्याच्या पाण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची जबाबदारी आहे. आरोग्य विभागाने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या चार महिन्यात तपासणीसाठी पाठविलेल्या पाण्याच्या ७६२ नमुन्यातून २४ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य व दूषित असल्याचा अहवाल आला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांना व ग्रामसेवकांना सभेमध्ये वारंवार सजगतेचा सल्ला देण्यात येतो; मात्र निगरगठ्ठ ग्रामसेवकांकडून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे निर्जतूकीकरण केल्या जात नाही. अनेक गावातील पाण्याच्या विहिरीत घाण, केरकचरा सडून गेला आहे. अनेक गावच्या पाण्याच्या जलकुंभाची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे गावात लहान मोठे आजार डोके वर काढीत असल्याचे चित्र आहे. पावसाळा तोंडावर असल्याने जलस्त्रोतांच्या नियमित साफसफाईस ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्याले गॅस्टोसारखे भयावह रोग गावात पसरू शकतात. याबाबत वेळीच सतर्क होणे आवश्यक आहे.