शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

२३३ वाहन चालकांचा परवाना केला निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 9:53 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.

ठळक मुद्देआरटीओची कारवाई : वाहतुकीचे नियम न पाळणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.दुचाकी प्रवासादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर महत्त्वाचा आहे. परंतु, पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षकांची खांदेपालट झाल्यापासून हेल्मेट क्रमप्राप्त मोहीम थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येते आहे. परंतु, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी हेल्मेटचे महत्त्व आणि दुचाकी चालकाची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटचा वापर न करणाºया १८४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी सहा वाहनचालकांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी निलंबित केला आहे. चारचाकीसह जड वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर न करताना आढळून आल्याने सहा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करताना १७ वाहनचालक आढळून आल्याने त्यांच्याकडून २ हजारांचा दंडा आकारण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी ११७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी ४८ वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. वाहनात क्षमतेपेक्षा जादा साहित्य भरून वाहतूक करणे हा कायदेशीर गुन्हाच आहे. परंतु, अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक प्रकरणी ४०२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४६ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. तर १६८ वाहनचालकांची परवाने निलंबित करण्यात आले आहेत. धोकादायक वाहतूक प्रकरणी नऊ जनांवर कारवाई करून १८ हजारांचा दंड वसूल करून आठ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.पथकाकडून या गोष्टींची होतेय तपासणीसुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केला की नाही.वाहनचालविताना वाहनचालकाने सिटबेल्ट लावला की नाही.कुठला वाहनचालक वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करतो काय.वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन तर चालवित नाही ना.वाहन चालकाजवळ विमा आहे की नाही तसेच कुठला वाहनचालक अवैध प्रवासी वाहतूक तर करीत नाही.