शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

टोकणधारक २,१७४ शेतकऱ्यांनी अल्पदरात विकले पांढरे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभागाचेही सहकार्य क्रमप्राप्त असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देखासगी व्यापाऱ्यांची चांदी : कृषी विभागाच्या गलथान कारभाराचा जिल्ह्यातील बळीराजाला आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कापसाचे किती उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा अंदाज यंदा चुकल्याचे वास्तव आहे. सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन गृहभेटी घेऊन जिल्ह्यातील शेतकºयांच्या घरी अंदाजे किती कापूस शिल्लक आहे याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत १२ हजार ७९२ शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन पाहणी केली असता सीसीआय आणि कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेल्या टोकण धारक २ हजार १७४ शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात पांढरेसोने विकल्याचे पुढे आले आहे. एकूणच कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजाचा जिल्ह्यातील बळीराजाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील एकूण ५० हजार ८८५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाकडे त्यांनी उत्पादीत केलेले पांढरेसोने विक्री करण्यासाठी नोंदणी करून टोकण प्राप्त केले. त्यापैकी २८ हजार ९१० शेतकऱ्यांकडील कापूस अजूनही सीसीआय किंवा कापूस पणन महासंघाकडे विकल्या न गेल्याचा फुगीव आकडा जिल्ह्यात कायम असल्याने वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस शिल्लक आहे काय या बाबतचे सर्वेक्षण केले जात आहे. सदर सर्वेक्षण येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार असले तरी आतापर्यंत टोकण धारक २,१७४ शेतकऱ्यांनी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाला कापूस न विकता थेट खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात कापूस विकल्याचे पुढे आले आहे. तशी नोंदणी सदर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.कृषी अधीक्षक कुंभकर्णी झोपेतच?शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभागाचेही सहकार्य क्रमप्राप्त असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याची ओरड होत आहे.सर्वेक्षणात हिंगणघाट तालुका अव्वलआतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १२ हजार ७९२ शेतकºयांच्या घरी भेटी देऊन कापूस विकला किंवा विकण्याचे शिल्लक आहे याची माहिती घेण्यात आली आहे. यात हिंगणघाट तालुक्यातील ३ हजार ३००, समुद्रपूर १ हजार ६४०, वर्धा २ हजार ५४९, देवळी १ हजार ५५, कारंजा (घा.) ७०६, आर्वी ७१०, सेलू २ हजार ७ तर आष्टी तालुक्यातील ८२५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.कृषी विभागाचे अधिकारी बांधावर जात नाही. त्यामुळे त्यांचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला. सरकारने अशा मस्तवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नोटीस बजावत विचारणा केली पाहिजे. शिवाय त्यांची तातडीने बदली केली पाहिजे; पण मुख्यमंत्रीच सध्या पावरहीन आहेत.- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्य, शेतकरी आत्महत्याग्रस्त समिती, वर्धा.

टॅग्स :cottonकापूस