शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

टोकणधारक २,१७४ शेतकऱ्यांनी अल्पदरात विकले पांढरे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभागाचेही सहकार्य क्रमप्राप्त असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देखासगी व्यापाऱ्यांची चांदी : कृषी विभागाच्या गलथान कारभाराचा जिल्ह्यातील बळीराजाला आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कापसाचे किती उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा अंदाज यंदा चुकल्याचे वास्तव आहे. सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन गृहभेटी घेऊन जिल्ह्यातील शेतकºयांच्या घरी अंदाजे किती कापूस शिल्लक आहे याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत १२ हजार ७९२ शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन पाहणी केली असता सीसीआय आणि कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेल्या टोकण धारक २ हजार १७४ शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात पांढरेसोने विकल्याचे पुढे आले आहे. एकूणच कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजाचा जिल्ह्यातील बळीराजाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील एकूण ५० हजार ८८५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाकडे त्यांनी उत्पादीत केलेले पांढरेसोने विक्री करण्यासाठी नोंदणी करून टोकण प्राप्त केले. त्यापैकी २८ हजार ९१० शेतकऱ्यांकडील कापूस अजूनही सीसीआय किंवा कापूस पणन महासंघाकडे विकल्या न गेल्याचा फुगीव आकडा जिल्ह्यात कायम असल्याने वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस शिल्लक आहे काय या बाबतचे सर्वेक्षण केले जात आहे. सदर सर्वेक्षण येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार असले तरी आतापर्यंत टोकण धारक २,१७४ शेतकऱ्यांनी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाला कापूस न विकता थेट खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात कापूस विकल्याचे पुढे आले आहे. तशी नोंदणी सदर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.कृषी अधीक्षक कुंभकर्णी झोपेतच?शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभागाचेही सहकार्य क्रमप्राप्त असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याची ओरड होत आहे.सर्वेक्षणात हिंगणघाट तालुका अव्वलआतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १२ हजार ७९२ शेतकºयांच्या घरी भेटी देऊन कापूस विकला किंवा विकण्याचे शिल्लक आहे याची माहिती घेण्यात आली आहे. यात हिंगणघाट तालुक्यातील ३ हजार ३००, समुद्रपूर १ हजार ६४०, वर्धा २ हजार ५४९, देवळी १ हजार ५५, कारंजा (घा.) ७०६, आर्वी ७१०, सेलू २ हजार ७ तर आष्टी तालुक्यातील ८२५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.कृषी विभागाचे अधिकारी बांधावर जात नाही. त्यामुळे त्यांचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला. सरकारने अशा मस्तवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नोटीस बजावत विचारणा केली पाहिजे. शिवाय त्यांची तातडीने बदली केली पाहिजे; पण मुख्यमंत्रीच सध्या पावरहीन आहेत.- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्य, शेतकरी आत्महत्याग्रस्त समिती, वर्धा.

टॅग्स :cottonकापूस