शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

25 न्यायपटलांवरून होणार 21,338 प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 5:00 AM

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे आपसातील तडजोडीअंती निकाली काढली जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील सहा वर्षांत राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६१ कोटी ९२ लाख २७ हजार ५४७ तडजोड मूल्य असलेल्या तब्बल १६ हजार ५७२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. लोकअदालतीत झटपट प्रकरणाचा निपटारा होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत असल्याने ते फायद्याचे ठरते.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमकर यांच्या नेतृत्त्वात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने शनिवार, १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीचे कामकाज तब्बल २५ न्यायपटलांवरून चालणार असून, त्यातील तीन पॅनल महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राहणार आहे. १२ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतील एकूण २१ हजार ३३८ प्रकरणे ठेवली जाणार आहेत.१८ हजार १४१ वाद दाखल प्रकरणांचा राहणार समावेश-    यंदाच्या राष्ट्रीय लोकअदालतीत वाद प्रकरणे दाखल पूर्व प्रकरणांमध्ये ग्रामपंचायत कराबाबतची १४ हजार ४४४, बॅंकेची २ हजार ७९६, बी. एस. एन. एल.ची ४६७, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची ३१३, नगर परिषदेची कर व पाणीपट्टीची १२१ अशी एकूण १८ हजार १४१ इतकी वाद दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय लोकअदालतीचे हिंगणघाट येथे एक तर वर्धा शहरात राहणार दोन महिला न्यायपीठ-    शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत तीन न्यायपीठ महिला चालविणार असून, यात वर्धा येथील दोन तर हिंगणघाट येथील एका न्यायपटलाचा समावेश आहे. हिंगणघाट येथे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आर. व्ही. डफरे यांच्यासह त्यांच्या सहा महिला सहकारी, वर्धा येथे पाचव्या सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. आर. लोहीया यांच्यासह त्यांच्या सात महिला सहकारी आणि वर्धा येथेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. पी. बाबर यांच्यासह त्यांच्या सहा महिला सहकारी सेवा देणार आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल तीन महिला न्यायपीठ देऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने स्त्री शक्तीला अभिवादनच केले आहे.

आपसी तडजोडीने निकाली निघणार प्रकरणे-    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे आपसातील तडजोडीअंती निकाली काढली जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील सहा वर्षांत राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६१ कोटी ९२ लाख २७ हजार ५४७ तडजोड मूल्य असलेल्या तब्बल १६ हजार ५७२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. लोकअदालतीत झटपट प्रकरणाचा निपटारा होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत असल्याने ते फायद्याचे ठरते.

३ हजार १९७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा राहणार समावेश-    शनिवारच्या राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे १३८ एन. आय. ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, ग्राहक तकार न्याय निवारण प्रकरणे अशी एकूण ३ हजार १९७ न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

शनिवार, १२ मार्चला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमकर यांच्या नेतृत्त्वात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. २५ न्यायपटलांवरून लोकअदालतीचे कामकाज होणार असून, २५पैकी तीन न्यायपीठ महिलांची राहणार आहेत.- निशांत परमा, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत