शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महालक्ष्मीचे जेवण करून निघालेल्या जिवलग मैत्रिणींचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 14:22 IST

पळसगाव व कारंजा गावात शोककळा

देवळी (वर्धा) : महालक्ष्मी कार्यक्रमानिमित्त आयोजित जेवणाच्या कार्यक्रमातून जेवण आटोपून दुचाकीने घरी जात असलेल्या वर्धा जिल्ह्यातील दोन जिवलग मैत्रिणींचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. २२) रात्री ८ वाजेच्या सुमारास बुट्टीबोरीनजीक झाला. दोन्ही तरुणींच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने पळगाव आणि कारंजा गावात शोककळा पसरली.

निकिता प्रमोद चौधरी (२३, रा. पळसगाव, ता. देवळी), वैष्णवी शंकर सरोदे (२५, रा. कारंजा घाडगे) असे मृत तरुणींची नावे आहेत. निकिता आणि वैष्णवी या दोघीही एकाचवेळी बी.एस्सीची (कृषी) पदवी घेऊन बोरखेडी येथील अंबुजा फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्प येथे नोकरीला लागल्या होत्या. त्या दोघीही बोरखेडी नजीकच्या आष्टा येथून महालक्ष्मीचे जेवण आटोपून दुचाकीने परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पळसगाव व कारंजा दोन्ही गावात शोकाकुल वातावरण होते.

निकिता व वैष्णवी या दोघीही अविवाहित असून, बोरखेडी येथे किरायाच्या खोलीत राहत होत्या. पोळ्याच्या दिवशी निकिता पळसगाव येथे घरी आली असता तिच्या वडिलांनी तिला नवीन मोपेड घेऊन दिली होती. निकिताच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ व आप्त परिवार आहे. शनिवारी सायंकाळी दोघींच्या पार्थिवावर त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार पार पडले.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा