शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

महालक्ष्मीचे जेवण करून निघालेल्या जिवलग मैत्रिणींचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 14:22 IST

पळसगाव व कारंजा गावात शोककळा

देवळी (वर्धा) : महालक्ष्मी कार्यक्रमानिमित्त आयोजित जेवणाच्या कार्यक्रमातून जेवण आटोपून दुचाकीने घरी जात असलेल्या वर्धा जिल्ह्यातील दोन जिवलग मैत्रिणींचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. २२) रात्री ८ वाजेच्या सुमारास बुट्टीबोरीनजीक झाला. दोन्ही तरुणींच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने पळगाव आणि कारंजा गावात शोककळा पसरली.

निकिता प्रमोद चौधरी (२३, रा. पळसगाव, ता. देवळी), वैष्णवी शंकर सरोदे (२५, रा. कारंजा घाडगे) असे मृत तरुणींची नावे आहेत. निकिता आणि वैष्णवी या दोघीही एकाचवेळी बी.एस्सीची (कृषी) पदवी घेऊन बोरखेडी येथील अंबुजा फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्प येथे नोकरीला लागल्या होत्या. त्या दोघीही बोरखेडी नजीकच्या आष्टा येथून महालक्ष्मीचे जेवण आटोपून दुचाकीने परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पळसगाव व कारंजा दोन्ही गावात शोकाकुल वातावरण होते.

निकिता व वैष्णवी या दोघीही अविवाहित असून, बोरखेडी येथे किरायाच्या खोलीत राहत होत्या. पोळ्याच्या दिवशी निकिता पळसगाव येथे घरी आली असता तिच्या वडिलांनी तिला नवीन मोपेड घेऊन दिली होती. निकिताच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ व आप्त परिवार आहे. शनिवारी सायंकाळी दोघींच्या पार्थिवावर त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार पार पडले.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा