शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:18 IST

राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार तीन वर्षात ४१६ गावे जलपरिपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा ३३, सेलू २८, देवळी ३५, आर्वी १५, आष्टी १८, कारंजा २४, हिंगणघाट १५ आणि समुद्रपूर २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण ते सर्व घेण्यासाठी आपलीच ओंजळ खुजी पडते. यावर्षी पाऊस कमी झाला म्हणून आपण निसर्गाच्या नावाने ओरडतो. पडणाऱ्या पावसापैकी ६० टक्के पाणी हे नदी नाल्यांमार्फत वाहून जाते. म्हणूनच वाया जाणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला अडवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी अनेक उपचार कामे करण्यात आलीत.२०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसायला लागल्यावर सामाजिक संस्थाही सहभागीसाठी पुढे सरसावल्या. तसेच अनेक कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधी जलयुक्तच्याकामासाठी देणे सुरू केले. शिवाय लोकांचा सहभाग वाढल्याने ही योजना खऱ्या अर्थाने लोकांची योजना म्हणून यशस्वी ठरली. यावर्षी जिल्ह्यात सरासरी पाऊस कमी असूनही एप्रिल महिन्यात सुद्धा अनेक नाल्यांमध्ये पाणी पाहायला मिळते. या पाण्यामुळे त्या भागातील भूजल पातळी कायम राखण्यास निश्चितच मदत होत आहे.जिल्ह्यात २०१५-१६ पासून सुरू झालेल्या या योजनेत पहिल्या वर्षी २१४ गावांचा समावेश होता. यापैकी १७३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. २०१६-१७ मध्ये निवडण्यात आलेल्या २१० गावांमध्ये २४३९ कामांच्या माध्यमातून सर्व गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच २०१७-१८ मध्ये निवडण्यात आलेल्या १४४ गावांपैकी ३३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. यापैकी ३३ गावांमध्ये १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ४३ गावांमध्ये ८० टक्के तर ६८ गावांमध्ये ५० टक्के काम झाले आहे. २०१७-१८ मधील सर्व शिल्लक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत. तसेच २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्ये १ मे पर्यंत लोकप्रतिनिधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करून कामे तात्काळ सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जलयुक्त शिवार अभियानात नालाखोलीकरणाच्या कामामुळे पांदण खराब होत असल्यास, शेतकऱ्यांना पांदण वहिवाटीसाठी सुरू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी बॅरेज कम बंधारा तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्यात.यशोदा नदीचे १६० कि.मी.चे काम पूर्णयशोदा नदी खोरे पुनर्जीवन प्रकल्प जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासन, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. कमलनयन जानकीदेवी बजाज फॉऊंडेशन संस्था या कामात सहभागी आहे. यात आर्वी, वर्धा, देवळी हिगणघाट तालुक्यातील १४३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ लघु पाणलोट क्षेत्रात वाहणारी नदी व तिला संलग्नित नाल्यांचे ६३० किलोमिटरचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम यामध्ये करण्यात येत आहे. यामुळे २ लक्ष ५ हजार ४३८ एकर जमिनीला फायदा होणार असून २७ हजार ९८९ शेतकरी कुटुंबाना याचा लाभ होईल.२०१६-१७ पासून या कामाला सुरूवात झाली असून सद्यास्थितीत २६३.८९ किलोमिटर पर्यंतचे काम झालेले आहे. यामध्ये ३८ लक्ष ७० हजार ५३९ घनफुट गाळ काढण्यात आला असून यामुळे ३ हजार ८७१ टी सीएम पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी २० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. याचा लाभ ८ हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे. तर ५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. उर्वरित ३६६ किलोमिटरचे काम प्रगतीपथावर आहे.

 

टॅग्स :WaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार