शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:18 IST

राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार तीन वर्षात ४१६ गावे जलपरिपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा ३३, सेलू २८, देवळी ३५, आर्वी १५, आष्टी १८, कारंजा २४, हिंगणघाट १५ आणि समुद्रपूर २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण ते सर्व घेण्यासाठी आपलीच ओंजळ खुजी पडते. यावर्षी पाऊस कमी झाला म्हणून आपण निसर्गाच्या नावाने ओरडतो. पडणाऱ्या पावसापैकी ६० टक्के पाणी हे नदी नाल्यांमार्फत वाहून जाते. म्हणूनच वाया जाणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला अडवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी अनेक उपचार कामे करण्यात आलीत.२०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसायला लागल्यावर सामाजिक संस्थाही सहभागीसाठी पुढे सरसावल्या. तसेच अनेक कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधी जलयुक्तच्याकामासाठी देणे सुरू केले. शिवाय लोकांचा सहभाग वाढल्याने ही योजना खऱ्या अर्थाने लोकांची योजना म्हणून यशस्वी ठरली. यावर्षी जिल्ह्यात सरासरी पाऊस कमी असूनही एप्रिल महिन्यात सुद्धा अनेक नाल्यांमध्ये पाणी पाहायला मिळते. या पाण्यामुळे त्या भागातील भूजल पातळी कायम राखण्यास निश्चितच मदत होत आहे.जिल्ह्यात २०१५-१६ पासून सुरू झालेल्या या योजनेत पहिल्या वर्षी २१४ गावांचा समावेश होता. यापैकी १७३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. २०१६-१७ मध्ये निवडण्यात आलेल्या २१० गावांमध्ये २४३९ कामांच्या माध्यमातून सर्व गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच २०१७-१८ मध्ये निवडण्यात आलेल्या १४४ गावांपैकी ३३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. यापैकी ३३ गावांमध्ये १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ४३ गावांमध्ये ८० टक्के तर ६८ गावांमध्ये ५० टक्के काम झाले आहे. २०१७-१८ मधील सर्व शिल्लक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत. तसेच २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्ये १ मे पर्यंत लोकप्रतिनिधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करून कामे तात्काळ सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जलयुक्त शिवार अभियानात नालाखोलीकरणाच्या कामामुळे पांदण खराब होत असल्यास, शेतकऱ्यांना पांदण वहिवाटीसाठी सुरू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी बॅरेज कम बंधारा तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्यात.यशोदा नदीचे १६० कि.मी.चे काम पूर्णयशोदा नदी खोरे पुनर्जीवन प्रकल्प जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासन, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. कमलनयन जानकीदेवी बजाज फॉऊंडेशन संस्था या कामात सहभागी आहे. यात आर्वी, वर्धा, देवळी हिगणघाट तालुक्यातील १४३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ लघु पाणलोट क्षेत्रात वाहणारी नदी व तिला संलग्नित नाल्यांचे ६३० किलोमिटरचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम यामध्ये करण्यात येत आहे. यामुळे २ लक्ष ५ हजार ४३८ एकर जमिनीला फायदा होणार असून २७ हजार ९८९ शेतकरी कुटुंबाना याचा लाभ होईल.२०१६-१७ पासून या कामाला सुरूवात झाली असून सद्यास्थितीत २६३.८९ किलोमिटर पर्यंतचे काम झालेले आहे. यामध्ये ३८ लक्ष ७० हजार ५३९ घनफुट गाळ काढण्यात आला असून यामुळे ३ हजार ८७१ टी सीएम पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी २० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. याचा लाभ ८ हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे. तर ५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. उर्वरित ३६६ किलोमिटरचे काम प्रगतीपथावर आहे.

 

टॅग्स :WaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार