शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:18 IST

राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार तीन वर्षात ४१६ गावे जलपरिपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा ३३, सेलू २८, देवळी ३५, आर्वी १५, आष्टी १८, कारंजा २४, हिंगणघाट १५ आणि समुद्रपूर २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण ते सर्व घेण्यासाठी आपलीच ओंजळ खुजी पडते. यावर्षी पाऊस कमी झाला म्हणून आपण निसर्गाच्या नावाने ओरडतो. पडणाऱ्या पावसापैकी ६० टक्के पाणी हे नदी नाल्यांमार्फत वाहून जाते. म्हणूनच वाया जाणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला अडवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी अनेक उपचार कामे करण्यात आलीत.२०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसायला लागल्यावर सामाजिक संस्थाही सहभागीसाठी पुढे सरसावल्या. तसेच अनेक कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधी जलयुक्तच्याकामासाठी देणे सुरू केले. शिवाय लोकांचा सहभाग वाढल्याने ही योजना खऱ्या अर्थाने लोकांची योजना म्हणून यशस्वी ठरली. यावर्षी जिल्ह्यात सरासरी पाऊस कमी असूनही एप्रिल महिन्यात सुद्धा अनेक नाल्यांमध्ये पाणी पाहायला मिळते. या पाण्यामुळे त्या भागातील भूजल पातळी कायम राखण्यास निश्चितच मदत होत आहे.जिल्ह्यात २०१५-१६ पासून सुरू झालेल्या या योजनेत पहिल्या वर्षी २१४ गावांचा समावेश होता. यापैकी १७३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. २०१६-१७ मध्ये निवडण्यात आलेल्या २१० गावांमध्ये २४३९ कामांच्या माध्यमातून सर्व गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच २०१७-१८ मध्ये निवडण्यात आलेल्या १४४ गावांपैकी ३३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. यापैकी ३३ गावांमध्ये १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ४३ गावांमध्ये ८० टक्के तर ६८ गावांमध्ये ५० टक्के काम झाले आहे. २०१७-१८ मधील सर्व शिल्लक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत. तसेच २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्ये १ मे पर्यंत लोकप्रतिनिधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करून कामे तात्काळ सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जलयुक्त शिवार अभियानात नालाखोलीकरणाच्या कामामुळे पांदण खराब होत असल्यास, शेतकऱ्यांना पांदण वहिवाटीसाठी सुरू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी बॅरेज कम बंधारा तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्यात.यशोदा नदीचे १६० कि.मी.चे काम पूर्णयशोदा नदी खोरे पुनर्जीवन प्रकल्प जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासन, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. कमलनयन जानकीदेवी बजाज फॉऊंडेशन संस्था या कामात सहभागी आहे. यात आर्वी, वर्धा, देवळी हिगणघाट तालुक्यातील १४३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ लघु पाणलोट क्षेत्रात वाहणारी नदी व तिला संलग्नित नाल्यांचे ६३० किलोमिटरचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम यामध्ये करण्यात येत आहे. यामुळे २ लक्ष ५ हजार ४३८ एकर जमिनीला फायदा होणार असून २७ हजार ९८९ शेतकरी कुटुंबाना याचा लाभ होईल.२०१६-१७ पासून या कामाला सुरूवात झाली असून सद्यास्थितीत २६३.८९ किलोमिटर पर्यंतचे काम झालेले आहे. यामध्ये ३८ लक्ष ७० हजार ५३९ घनफुट गाळ काढण्यात आला असून यामुळे ३ हजार ८७१ टी सीएम पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी २० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. याचा लाभ ८ हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे. तर ५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. उर्वरित ३६६ किलोमिटरचे काम प्रगतीपथावर आहे.

 

टॅग्स :WaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार