शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणाने दिला १६ हजार मनुष्य दिवस रोजगार

By admin | Updated: July 28, 2014 23:41 IST

पर्यावरण संरक्षणार्थ हरितम्, शतकोटी वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांतून कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात लाखो रोपांची लागवड करण्यात आली़ यापैकी किती झाडे जगली, हा अभ्यासाचा विषय आहे़

हजारो वृक्ष जिवंत : सात ते आठ फुटांपर्यंत वाढलीत झाडेकिरण उपाध्ये - पुलगावपर्यावरण संरक्षणार्थ हरितम्, शतकोटी वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांतून कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात लाखो रोपांची लागवड करण्यात आली़ यापैकी किती झाडे जगली, हा अभ्यासाचा विषय आहे़ देवळी तालुक्यात मात्र सामाजिक वनीकरण विभागाने गत दोन वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या वृक्षारोपणाने सरासरी १६ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून दिला़ वनिकरणने १२ हजार वृक्षांचे रोपण केले आहे़ सामाजिक वनीकरण विभागात काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे़ सेवानिवृत्त वा बदली झालेल्या रिक्त पदावर नवीन कर्मचारी नियुक्त झाले नाहीत़ इत:पर मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर वनिकरण विभाग सामाजिक बांधिलकीचे काम पार पाडत आहे़ देवळी तालुक्यातील १५ शाळांतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विविध उपक्रमांचे प्रशिक्षण, प्रगतीचा लेखाजोखा ठेवणे, वृक्षदिंडी, नाल्यांवर बंधारे बांधणे, स्वच्छता अभियान, रंगपंचमी होळीला पर्यावरणपूरक व रसायनविरहित रंग वापरणे, सर्पमैत्री, सहल, प्रदूषणविरहित फटाके फोडणे, चित्रकला, वादविवाद, निबंध स्पर्धांचे आयोजन, शेतकऱ्यांना साग, बांबू, वृक्ष लागवडीबद्दल सातत्याने प्रबोधन करणे आदी कामे करीत आहे़ त्यातच शतकोटी उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने शासकीय, निमशासकीय कार्यालय, नझुल, महसूल, संस्था, शाळांच्या पडित जमिनीचे सर्वेक्षण करून त्यांच्या अखत्यारितील जागेवर वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले होते; पण अद्याप ३३ टक्के भूप्रदेश वनाच्छादीत झाल्याचे दिसत नाही़महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाचे वर्धा जिल्हा उपसंचालक बडगे यांच्या मार्गदर्शनात दोन वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड व संगोपण करून ग्रामीण लोकांना रोजगार दिला आहे़ यात २०१२ मध्ये रत्नापूर-अडेगाव या ४ मिकी अंतरावर २ हजार, २०१३ मध्ये विजयगोपाल-इंझाळा, भिडी-बाभुळगाव मार्गावर ३ हजार झाडे, दिघी-देवळी-वायगाव रोडवर १ हजार झाडे, २०१४ मध्ये कोळोणा (घो़) - विजयगोपाल, रोहिणी-शिरपूर-वाटखेडा ते अडेगाव मार्गाच्या दुतर्फा विविध प्रजातींची ६ हजार रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे़ शिवाय या वर्षी मनरेगा अंतर्गत गुंजखेडा येथे १५ हजार रोपांची रोपवाटिका सुरू करण्यात आली आहे़ या रोपवाटिकेवर अंदाजे १ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे़ यातून आतापर्यंत १६ हजार मनुष्य दिवस रोजगार दिला आहे़ ही सर्व झाडे जिवंत असून ५ ते ७ फुट उंचीची झाली आहेत़