शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

१३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:57 IST

पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे.

ठळक मुद्देपुलगाव सीएडी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र : सन २००० पासून गावांचे पुनर्वसन दुर्लक्षित

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे. त्यामुळे रक्षामंत्रालयाच्यावतीने सन २००२ ला पुलगाव डिफेन्सवॉलच्या बाहेरील दोन हजार यार्ड (२ कि़मी.) परिसरातील ही सर्व गावे हटविण्याची प्रक्रिया पार पाडली होती. पण सोळा वर्षाच्या कालावधीनंतरही येथील नारिकांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.या तेरा गावांच्या पुनर्वसनासंदर्भात प्रक्रिया सुरु करुन सलग दोन वर्षपर्यंत या गावातील विकासकामे थांबविण्यात आली होती. रक्षा मंत्रालयाचे अप्पर सचिव ललीत चव्हाण यांनी राज्य सरकारला व राज्य सरकारने तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद म्हैसकार यांच्या मार्फत संबंधित ग्रामपंचायतींना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नोटीस बजावून या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती दिली होती. परंतु राज्य सरकारच्यावतीने संबंधित गावांना सेक्शन ४ ची नोटीस न दिल्याने तसेच वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे या गावांच्या पुनर्वसेनाचा मुद्दा थंडबस्त्यात पडला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या १६ वर्षात या गावांच्या पुनर्वसनाबाबतची रक्षामंत्रालयाची फाईल धुळखात पडली आहे.सन २००२ नुसार या गाव परिसराची लोकसंख्या २२ हजार ६५३ असून ४ हजार २६२ घरे तसेच ५०० हेक्टर जमीन आहे. हा सर्व परिसर ताबडतोब हटविण्याबाबतचे पत्र सीएडी कॅम्पचे तत्कालीन मेजर के.एस. महार, कॅप्टन पंजरन, मुंबई डिईओ पी.एल. रविदास व स्थानिक तहसीलदार टी.एस. बावणे यांचे स्वाक्षरीनिशी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले होते. जिल्हाधिकारी व सीएडी कॅम्प अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार सलग दोन वर्षापर्यंत या गावातील विकासाची कामे थांबविण्यात आली होती. परंतु गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया किचकट व टप्प्याटप्प्याने करावयाची असल्याने त्यावेळी राज्यशासनाने रक्षामंत्रालयाला सांगितले होते.तेव्हापासून क्षामंत्रालयाच्यावतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून या गावांच्या पुनर्वसनाबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मागील काही वर्षात या भागात भयंकर घटना घडल्या आहे. जीवंत बॉम्ब गावात येवून पडल्याने जीवाच्या आकांताने लोक सैरावैरा पळाल्याचे उदाहरणे आहे. वारंवार होणाऱ्या घटनेत अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रतिबंधित ठरलेली गावे उठविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.देवळी परिसरात गावांचे पुनर्वसन करादेवळी तालुक्यातील नाचणगाव, पिपरी, आगरगाव, नागझरी, मुरदगाव, येसगाव, नंदपूर, शेकापूर, शेकापूर (झोपडी), चिटकी, हरलापूर, बच्चराजपूर आदी गावात नेहमी घडणाऱ्या घटना चिंताजनक ठरल्या आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी या गावांचे देवळी भागात पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणीमाजी जि.प. सदस्य मोहन शिदोडकर यांनी लावून धरली आहे..

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोट