शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

१३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:57 IST

पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे.

ठळक मुद्देपुलगाव सीएडी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र : सन २००० पासून गावांचे पुनर्वसन दुर्लक्षित

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे. त्यामुळे रक्षामंत्रालयाच्यावतीने सन २००२ ला पुलगाव डिफेन्सवॉलच्या बाहेरील दोन हजार यार्ड (२ कि़मी.) परिसरातील ही सर्व गावे हटविण्याची प्रक्रिया पार पाडली होती. पण सोळा वर्षाच्या कालावधीनंतरही येथील नारिकांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.या तेरा गावांच्या पुनर्वसनासंदर्भात प्रक्रिया सुरु करुन सलग दोन वर्षपर्यंत या गावातील विकासकामे थांबविण्यात आली होती. रक्षा मंत्रालयाचे अप्पर सचिव ललीत चव्हाण यांनी राज्य सरकारला व राज्य सरकारने तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद म्हैसकार यांच्या मार्फत संबंधित ग्रामपंचायतींना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नोटीस बजावून या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती दिली होती. परंतु राज्य सरकारच्यावतीने संबंधित गावांना सेक्शन ४ ची नोटीस न दिल्याने तसेच वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे या गावांच्या पुनर्वसेनाचा मुद्दा थंडबस्त्यात पडला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या १६ वर्षात या गावांच्या पुनर्वसनाबाबतची रक्षामंत्रालयाची फाईल धुळखात पडली आहे.सन २००२ नुसार या गाव परिसराची लोकसंख्या २२ हजार ६५३ असून ४ हजार २६२ घरे तसेच ५०० हेक्टर जमीन आहे. हा सर्व परिसर ताबडतोब हटविण्याबाबतचे पत्र सीएडी कॅम्पचे तत्कालीन मेजर के.एस. महार, कॅप्टन पंजरन, मुंबई डिईओ पी.एल. रविदास व स्थानिक तहसीलदार टी.एस. बावणे यांचे स्वाक्षरीनिशी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले होते. जिल्हाधिकारी व सीएडी कॅम्प अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार सलग दोन वर्षापर्यंत या गावातील विकासाची कामे थांबविण्यात आली होती. परंतु गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया किचकट व टप्प्याटप्प्याने करावयाची असल्याने त्यावेळी राज्यशासनाने रक्षामंत्रालयाला सांगितले होते.तेव्हापासून क्षामंत्रालयाच्यावतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून या गावांच्या पुनर्वसनाबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मागील काही वर्षात या भागात भयंकर घटना घडल्या आहे. जीवंत बॉम्ब गावात येवून पडल्याने जीवाच्या आकांताने लोक सैरावैरा पळाल्याचे उदाहरणे आहे. वारंवार होणाऱ्या घटनेत अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रतिबंधित ठरलेली गावे उठविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.देवळी परिसरात गावांचे पुनर्वसन करादेवळी तालुक्यातील नाचणगाव, पिपरी, आगरगाव, नागझरी, मुरदगाव, येसगाव, नंदपूर, शेकापूर, शेकापूर (झोपडी), चिटकी, हरलापूर, बच्चराजपूर आदी गावात नेहमी घडणाऱ्या घटना चिंताजनक ठरल्या आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी या गावांचे देवळी भागात पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणीमाजी जि.प. सदस्य मोहन शिदोडकर यांनी लावून धरली आहे..

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोट