शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

१३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:57 IST

पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे.

ठळक मुद्देपुलगाव सीएडी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र : सन २००० पासून गावांचे पुनर्वसन दुर्लक्षित

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे. त्यामुळे रक्षामंत्रालयाच्यावतीने सन २००२ ला पुलगाव डिफेन्सवॉलच्या बाहेरील दोन हजार यार्ड (२ कि़मी.) परिसरातील ही सर्व गावे हटविण्याची प्रक्रिया पार पाडली होती. पण सोळा वर्षाच्या कालावधीनंतरही येथील नारिकांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.या तेरा गावांच्या पुनर्वसनासंदर्भात प्रक्रिया सुरु करुन सलग दोन वर्षपर्यंत या गावातील विकासकामे थांबविण्यात आली होती. रक्षा मंत्रालयाचे अप्पर सचिव ललीत चव्हाण यांनी राज्य सरकारला व राज्य सरकारने तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद म्हैसकार यांच्या मार्फत संबंधित ग्रामपंचायतींना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नोटीस बजावून या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती दिली होती. परंतु राज्य सरकारच्यावतीने संबंधित गावांना सेक्शन ४ ची नोटीस न दिल्याने तसेच वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे या गावांच्या पुनर्वसेनाचा मुद्दा थंडबस्त्यात पडला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या १६ वर्षात या गावांच्या पुनर्वसनाबाबतची रक्षामंत्रालयाची फाईल धुळखात पडली आहे.सन २००२ नुसार या गाव परिसराची लोकसंख्या २२ हजार ६५३ असून ४ हजार २६२ घरे तसेच ५०० हेक्टर जमीन आहे. हा सर्व परिसर ताबडतोब हटविण्याबाबतचे पत्र सीएडी कॅम्पचे तत्कालीन मेजर के.एस. महार, कॅप्टन पंजरन, मुंबई डिईओ पी.एल. रविदास व स्थानिक तहसीलदार टी.एस. बावणे यांचे स्वाक्षरीनिशी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले होते. जिल्हाधिकारी व सीएडी कॅम्प अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार सलग दोन वर्षापर्यंत या गावातील विकासाची कामे थांबविण्यात आली होती. परंतु गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया किचकट व टप्प्याटप्प्याने करावयाची असल्याने त्यावेळी राज्यशासनाने रक्षामंत्रालयाला सांगितले होते.तेव्हापासून क्षामंत्रालयाच्यावतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून या गावांच्या पुनर्वसनाबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मागील काही वर्षात या भागात भयंकर घटना घडल्या आहे. जीवंत बॉम्ब गावात येवून पडल्याने जीवाच्या आकांताने लोक सैरावैरा पळाल्याचे उदाहरणे आहे. वारंवार होणाऱ्या घटनेत अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रतिबंधित ठरलेली गावे उठविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.देवळी परिसरात गावांचे पुनर्वसन करादेवळी तालुक्यातील नाचणगाव, पिपरी, आगरगाव, नागझरी, मुरदगाव, येसगाव, नंदपूर, शेकापूर, शेकापूर (झोपडी), चिटकी, हरलापूर, बच्चराजपूर आदी गावात नेहमी घडणाऱ्या घटना चिंताजनक ठरल्या आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी या गावांचे देवळी भागात पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणीमाजी जि.प. सदस्य मोहन शिदोडकर यांनी लावून धरली आहे..

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोट