शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

वर्षभरात वीज चोरीचे १ हजार २२५ धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची वीज चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:34 IST

Wardha : मीटर घेऊनच विजेचा वापर करावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात महावितरणने केलेल्या धडक कारवाईत गेल्या १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात वीज चोरीचे तब्बल १ हजार २२५ गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या चोरीमुळे महावितरणला १ कोटी ९३ लाख ११ हजार रुपयांच्या १ लाख ३३ हजार ४८९ युनिट विजेचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष गरजेव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्षपणे वीज वापरणाऱ्या ६० ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. 

महावितरणने वीज चोरीविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतलेल्या या कारवाईमध्ये वर्धा जिल्ह्यातील १ हजार २२५ वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरीच्या बिलासह दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी १ हजार २१३ ग्राहकांकडून तडजोडीपोटी ३८ लाख १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, वीज चोरी करणाऱ्यांमध्ये तारांवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या ३६५ ग्राहकांचा समावेश आहे, तर ८६० ग्राहकांनी थेट मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, रिमोट कंट्रोलने मीटर दुरून बंद करणे, मीटरमध्ये छिद्र पाडून रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती कमी करणे यासारख्या गैरमार्गाचा अवलंब करून वीज चोरली आहे. यासोबतच, अधिक धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्ष वीज वापरणाऱ्या ६० ग्राहकांनी ३ हजार ५८७ युनिट विजेचा अनधिकृत वापर केला, ज्यासाठी त्यांना ७ लाख ८० हजार रुपयांचे देयक आकारण्यात आले आहे.

वीज चोरीसाठी वापरल्या नवनवीन क्लृप्त्यामोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या काळात उघडकीस आलेल्या वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये चोरांनी अवलंबलेल्या क्लृप्त्या पाहून अधिकारीही चक्रावून गेले. यात मीटरमध्ये अत्यंत चलाखीने फेरबदल करणे, ते पूर्णपणे बंद पाडणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रिमोटने मीटर बंद करणे, तसेच मीटरच्या मागील बाजूस छिद्र पाडून त्यात अडथळा निर्माण करून मीटरची गती कमी करणे यासारख्या नवनवीन पद्धतींचा वापर उघडकीस आला आहे.

मीटर घेऊनच विजेचा वापर करावावीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे वीजवाहिन्या आणि रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येतो. यामुळे रोहित्र निकामी होणे, शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होणे यासारख्या समस्या उद्भवतात. याचा नाहक त्रास नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागतो आणि महावितरणलाही मोठा आर्थिक फटका बसतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे, सर्व नागरिकांनी अधिकृत वीज मीटर घेऊनच विजेचा वापर करावा आणि वापरलेल्या विजेच्या बिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष तपासणीला सुरुवातवीज चोरांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. याअंतर्गत, सदोष मीटर, तसेच सरासरी वीज बिल असलेल्या सर्वच ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले आणि सवलत देऊनही अभय योजनेत सहभागी न झालेल्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व ग्राहकांच्या प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :electricityवीजMONEYपैसाbillबिलwardha-acवर्धा