शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालये, विविध व्यावसायिकांंना १२ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने होत असतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध प्रकारचे सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम अशा सर्वावरच बंदी आणण्यात आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे ऐन लग्नसराईचा हंगाम गेला हातून : अर्थकारण कोमलमडले, अवलंबित कुटुंबीय अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाऊन करण्याची वेळ आली आणि अगदी मजुरीवर काम करणाऱ्या मजुरापासून अब्जावधीची उलाढाल सणाºया उद्योगपतीपर्यंत सर्वच घटकांना मोठा फटका बसला. कोरोनामुळे एप्रिल, मे महिन्यात होणारे ऐन लग्नसराईतील विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ यजमानांवर आल्याने विवाह मंगल कार्यालये, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड व्यापारी, सराफा, कॅटरर्स, किराणा मालाचे व्यापारी, फेटेवाले, वाजंत्री यांच्यासह जिल्ह्यातील विविध घटकांना सुमारे १२ कोटींच्या अर्थकारणावर पाणी सोडावे लागणार आहे.आता एप्रिल महिना जवळपास निम्मा संपत आला आहे. लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढले. अशा परिस्थितीत लग्नसराईचा हंगाम पुरता वाया गेला आहे.तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने होत असतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध प्रकारचे सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम अशा सर्वावरच बंदी आणण्यात आली. हळूहळू देशासह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या. शासकीय कार्यालयातील उपस्थिती निम्म्यावर आणण्यात आली. तर २२ मार्चला पंतप्रधांनी देशात जनता कर्फ्यू लागू केला आणि त्यानंतर अगदी दोन दिवसांनीच देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत ३० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. या लॉकडाऊनचा मोठा फटका एप्रिल, मे महिन्यातील विवाह सोहळ्यांना बसला आहे. धूमधडाक्यात लग्नसोहळा साजरा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसांना एकत्र येण्यावरच बंधने आहेत. अशा पार्श्वभूमीवर लग्नसोहळे, करायचे कसे? नोकरी, धंद्यानिमित्त स्थिरावलेली मंडळी विविध ठिकाणी अडकून पडली आहेत. अशा परिस्थितीत वर्धेत पूर्वनियोजित ठरलेले एप्रिल, मे महिन्यातील विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे. अर्थात लॉकडाऊन कधी उठणार यावरच ते अवलंबून असणार आहे. लॉकडाऊन उठले तरी माणसांच्या संख्येवर निर्बंध येणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक यजमानांनी विवाह साहळे पुढे ढकलल्याचे शहरातील विवाह मंगल कार्यालयचालकांनी सांगितले.जिल्ह्यात १०० ते १२५ मंगल कार्यालयेजिल्ह्यात लहान-मोठे सुमारे शंभर ते सव्वाशे मंगल कार्यालये आहेत. ग्रामीण भागात अद्याप गावात विवाह सोहळे आयोजित करण्याची प्रथा आहे. साधारणपणे सव्वाशेपैकी ४० ते ५० मंगल कार्यालये सर्वच मुहूर्तासाठी बुक असतात. विवाह सोहळ्याबरोबरच साखरपुडे, मौंज, वाढदिवस असेही कार्यक्रम मंगल कार्यालयांमध्ये होत असतात. साधारणपणे एक विवाह झाला तर त्या मंगल कार्यालयाचे भाडे कॅटरर्स, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड, किराणा व्यापारी. सराफ, वांजत्री आदी विविध घटकांना सुमारे दीड ते दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत असते.व्यवसायावर ५० कुटुंब निर्भरलॉकडाऊनमुळे यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात होणारे विवाह सोहळे रद्द करावे लागले. एप्रिल महिन्यात १४, १५, २५ आणि २६ एप्रिल म्हणजे अक्षयतृतीया असे मुहूर्त होते. अक्षयतृतीयेला विवाह सोहळ्यांची संख्या अधिक होती. आतापर्यंत ८ ते १० विवाह सोहळे लागले आहेत. तर मे महिन्यातील १२ दिवस विवाह सोहळ्यांचे मुहूर्त होते. त्यावरही आता सावट निर्माण झाले आहे. जरी एप्रिल आणि मे महिन्यातील लग्नसोहळ्याचे अर्थकारण शक्यता नसल्याने या विविध घटकांना सुमारे १२ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका ऐन लग्नसराई हंगामाला बसला आहे. दरवर्षी लग्नसराईत हंगामावेळी एवढे विवाह सोहळे असतात की आम्हाला एरवी नाईलाजास्तव ते सोडावे लागतात. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका विवाहसोहळ्यामुळे ५० कुटुंबांना फायदा होत असतो. मात्र, यावर्षी साऱ्यांवरच पाणी सोडावे लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात या कुटुंबांची जबाबदारीही आली आहे. अनेकांनी पुढील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आपले विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम आमच्यासाठी कसोटीचा असल्याचे जिल्ह्यातील अनेक मंगल कार्यालयचालक, मालकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय