शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

मंगल कार्यालये, विविध व्यावसायिकांंना १२ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने होत असतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध प्रकारचे सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम अशा सर्वावरच बंदी आणण्यात आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे ऐन लग्नसराईचा हंगाम गेला हातून : अर्थकारण कोमलमडले, अवलंबित कुटुंबीय अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाऊन करण्याची वेळ आली आणि अगदी मजुरीवर काम करणाऱ्या मजुरापासून अब्जावधीची उलाढाल सणाºया उद्योगपतीपर्यंत सर्वच घटकांना मोठा फटका बसला. कोरोनामुळे एप्रिल, मे महिन्यात होणारे ऐन लग्नसराईतील विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ यजमानांवर आल्याने विवाह मंगल कार्यालये, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड व्यापारी, सराफा, कॅटरर्स, किराणा मालाचे व्यापारी, फेटेवाले, वाजंत्री यांच्यासह जिल्ह्यातील विविध घटकांना सुमारे १२ कोटींच्या अर्थकारणावर पाणी सोडावे लागणार आहे.आता एप्रिल महिना जवळपास निम्मा संपत आला आहे. लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढले. अशा परिस्थितीत लग्नसराईचा हंगाम पुरता वाया गेला आहे.तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने होत असतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध प्रकारचे सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम अशा सर्वावरच बंदी आणण्यात आली. हळूहळू देशासह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या. शासकीय कार्यालयातील उपस्थिती निम्म्यावर आणण्यात आली. तर २२ मार्चला पंतप्रधांनी देशात जनता कर्फ्यू लागू केला आणि त्यानंतर अगदी दोन दिवसांनीच देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत ३० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. या लॉकडाऊनचा मोठा फटका एप्रिल, मे महिन्यातील विवाह सोहळ्यांना बसला आहे. धूमधडाक्यात लग्नसोहळा साजरा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसांना एकत्र येण्यावरच बंधने आहेत. अशा पार्श्वभूमीवर लग्नसोहळे, करायचे कसे? नोकरी, धंद्यानिमित्त स्थिरावलेली मंडळी विविध ठिकाणी अडकून पडली आहेत. अशा परिस्थितीत वर्धेत पूर्वनियोजित ठरलेले एप्रिल, मे महिन्यातील विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे. अर्थात लॉकडाऊन कधी उठणार यावरच ते अवलंबून असणार आहे. लॉकडाऊन उठले तरी माणसांच्या संख्येवर निर्बंध येणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक यजमानांनी विवाह साहळे पुढे ढकलल्याचे शहरातील विवाह मंगल कार्यालयचालकांनी सांगितले.जिल्ह्यात १०० ते १२५ मंगल कार्यालयेजिल्ह्यात लहान-मोठे सुमारे शंभर ते सव्वाशे मंगल कार्यालये आहेत. ग्रामीण भागात अद्याप गावात विवाह सोहळे आयोजित करण्याची प्रथा आहे. साधारणपणे सव्वाशेपैकी ४० ते ५० मंगल कार्यालये सर्वच मुहूर्तासाठी बुक असतात. विवाह सोहळ्याबरोबरच साखरपुडे, मौंज, वाढदिवस असेही कार्यक्रम मंगल कार्यालयांमध्ये होत असतात. साधारणपणे एक विवाह झाला तर त्या मंगल कार्यालयाचे भाडे कॅटरर्स, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड, किराणा व्यापारी. सराफ, वांजत्री आदी विविध घटकांना सुमारे दीड ते दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत असते.व्यवसायावर ५० कुटुंब निर्भरलॉकडाऊनमुळे यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात होणारे विवाह सोहळे रद्द करावे लागले. एप्रिल महिन्यात १४, १५, २५ आणि २६ एप्रिल म्हणजे अक्षयतृतीया असे मुहूर्त होते. अक्षयतृतीयेला विवाह सोहळ्यांची संख्या अधिक होती. आतापर्यंत ८ ते १० विवाह सोहळे लागले आहेत. तर मे महिन्यातील १२ दिवस विवाह सोहळ्यांचे मुहूर्त होते. त्यावरही आता सावट निर्माण झाले आहे. जरी एप्रिल आणि मे महिन्यातील लग्नसोहळ्याचे अर्थकारण शक्यता नसल्याने या विविध घटकांना सुमारे १२ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका ऐन लग्नसराई हंगामाला बसला आहे. दरवर्षी लग्नसराईत हंगामावेळी एवढे विवाह सोहळे असतात की आम्हाला एरवी नाईलाजास्तव ते सोडावे लागतात. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका विवाहसोहळ्यामुळे ५० कुटुंबांना फायदा होत असतो. मात्र, यावर्षी साऱ्यांवरच पाणी सोडावे लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात या कुटुंबांची जबाबदारीही आली आहे. अनेकांनी पुढील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आपले विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम आमच्यासाठी कसोटीचा असल्याचे जिल्ह्यातील अनेक मंगल कार्यालयचालक, मालकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय