शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी कोरले शेतीनिष्ठ पुरस्कारावर नाव

By admin | Updated: February 28, 2015 00:15 IST

बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले.

विजय माहुरे घोराड बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले. असे असले तरी जिजामाता कृषिभूषण व कृषिरत्न पुरस्कारापासून तालुका आजही वंचितच राहिला आहे.शेतातील काळ्या मातीत घाम गाळून धान्य विकविणाऱ्या शेतकऱ्यांची आजची स्थिती बिकट झाल्याचे वास्तव आहे. कधी काळी मिळालेले हे पुरस्कार शेतकऱ्यांना अरज मदत देणारे ठरू शकतात. तालुक्यात १९६७ मध्ये पहिला शेतीनिष्ठ पुरस्काराचे सालई (पेवठ) येथील रामचंद्र आत्माराम अहेर यांनी पटकाविला. शेतीत उत्कृष्ट कार्य, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करणारे, सामाजिक बांधिलकीतून काम, नवनविन पिके घेवून प्रगती करणाऱ्या तसेच सतत तीन वर्ष कृषी पर्यटन यात शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे. सोबतच मत्स्य व्यवसाय, दुग्धव्यवसाय, भाजीपाला, फळबाग व फुलबाग घेणारे शेतकरी तसेच गोबर गॅस, सौरशक्ती, निर्धूर चुली, पवन चक्की याही बाबी शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी केलेल्या अर्जात नमूद कराव्या लागत आहे. यावर पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या कृषी विभागामार्फत पाहणी करून गुण दिले जाते. बागायती तालुका असलेल्या यास परिसरात केळी, ऊस, लांब धाग्याचा कापूस पिकविणारे व नवनवीन पिके घेणारे शेतकरी आहेत. शेडनेट, पॉलीहाऊसच्या माध्यमातून दर्जदार पिके घेण्याकरिता युवा शेतकरी धडपड करीत आहे.या पुरस्कारासाठी प्रस्ताव शेतकरी सादर करीत असताना पंचायत समितीच्या कृषी विभागातील अधिकारी योग्य मार्गदर्शन आवश्यक ुआहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी प्रस्तावच सादर करीत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.