शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही स्वदेशासाठी जगू अन् देशासाठी मरू; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशभक्तीचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:18 IST

मुख्यमंत्री योगी म्हणाले, तिरंगा प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे, स्वदेशी जीवनाचा मंत्र बनला पाहिजे.

लखनौ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी काकोरी ट्रेन अॅक्शन शताब्दी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी सध्याच्या पिढीला देशभक्ती आणि स्वदेशी स्वीकारण्याचे आवाहन केले. "स्वदेशी आपल्या जीवनाचे ध्येय बनले पाहिजे, स्वदेशी आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे, आपण स्वदेशीसाठी जगू, आपण आपल्या देशासाठी मरू. जेव्हा भारत देशभक्तीच्या या उंचीने पुढे जाईल, त्यावेळी जगातील कोणतीही शक्ती भारताचे नुकसान करू शकणार नाही. स्वातंत्र्याचा हा संदेश आपल्या सर्वांना या उद्दिष्टाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे",असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काकोरी रेल्वे हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या सुपुत्रांना अभिवादन केले.  त्यांनी कार्यक्रमस्थळी पिंपळाचे झाडही लावले. त्यांनी लहानांना राखी बांधली आणि मुलींना मिठाई आणि चॉकलेट भेट दिली. त्यानंतर त्यांनी संग्रहालयात सेल्फी आणि फोटोशूट देखील केले. मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला, तर काकोरी रेल्वे हल्ल्याच्या घटनेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही केले. या दरम्यान, संस्कृती विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

काकोरी क्रांतिकारकांनी देशभक्तीची ज्योत पेटवली

यावेळी आपल्या भाषमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी येथे ब्रिटीश सरकारच्या तिजोरीवर कब्जा त्यांनी केला. त्या पैशाचा वापर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात केला. महान क्रांतिकारकांनी पेटवलेल्या देशभक्तीच्या ज्योतीमुळे १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला.  रेल्वे कारवाईत फक्त ४६०० रुपये लुटले  होते, परंतु ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता, असंही त्यांनी सांगितले. 

"त्या क्रांतिकारकांना खटल्याशिवाय फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद ब्रिटिश सरकारच्या हाती लागले नाहीत, तर त्यांनी स्वतः लढून शहीद झाले. आजचा हा शताब्दी उत्सव त्या महान क्रांतिकारकांना आठवण्याचा एक उत्तम दिवस आहे. आपल्या सध्याच्या पिढीसाठी ही एक नवीन प्रेरणा आहे. १०० वर्षांपूर्वी या महान स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना आठवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक देशवासीयाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश