शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
3
हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
5
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
6
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
9
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
10
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
11
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
12
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
13
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
14
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
15
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
16
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
17
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
18
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
19
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
20
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही स्वदेशासाठी जगू अन् देशासाठी मरू; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशभक्तीचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:18 IST

मुख्यमंत्री योगी म्हणाले, तिरंगा प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे, स्वदेशी जीवनाचा मंत्र बनला पाहिजे.

लखनौ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी काकोरी ट्रेन अॅक्शन शताब्दी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी सध्याच्या पिढीला देशभक्ती आणि स्वदेशी स्वीकारण्याचे आवाहन केले. "स्वदेशी आपल्या जीवनाचे ध्येय बनले पाहिजे, स्वदेशी आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे, आपण स्वदेशीसाठी जगू, आपण आपल्या देशासाठी मरू. जेव्हा भारत देशभक्तीच्या या उंचीने पुढे जाईल, त्यावेळी जगातील कोणतीही शक्ती भारताचे नुकसान करू शकणार नाही. स्वातंत्र्याचा हा संदेश आपल्या सर्वांना या उद्दिष्टाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे",असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काकोरी रेल्वे हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या सुपुत्रांना अभिवादन केले.  त्यांनी कार्यक्रमस्थळी पिंपळाचे झाडही लावले. त्यांनी लहानांना राखी बांधली आणि मुलींना मिठाई आणि चॉकलेट भेट दिली. त्यानंतर त्यांनी संग्रहालयात सेल्फी आणि फोटोशूट देखील केले. मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला, तर काकोरी रेल्वे हल्ल्याच्या घटनेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही केले. या दरम्यान, संस्कृती विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

काकोरी क्रांतिकारकांनी देशभक्तीची ज्योत पेटवली

यावेळी आपल्या भाषमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी येथे ब्रिटीश सरकारच्या तिजोरीवर कब्जा त्यांनी केला. त्या पैशाचा वापर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात केला. महान क्रांतिकारकांनी पेटवलेल्या देशभक्तीच्या ज्योतीमुळे १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला.  रेल्वे कारवाईत फक्त ४६०० रुपये लुटले  होते, परंतु ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता, असंही त्यांनी सांगितले. 

"त्या क्रांतिकारकांना खटल्याशिवाय फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद ब्रिटिश सरकारच्या हाती लागले नाहीत, तर त्यांनी स्वतः लढून शहीद झाले. आजचा हा शताब्दी उत्सव त्या महान क्रांतिकारकांना आठवण्याचा एक उत्तम दिवस आहे. आपल्या सध्याच्या पिढीसाठी ही एक नवीन प्रेरणा आहे. १०० वर्षांपूर्वी या महान स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना आठवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक देशवासीयाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश