शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 16:27 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीक उत्तर प्रदेशचे निकाल कमालीचे धक्कादायक लागले होते. तसेच त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवाबाबतचं चिंतन आणि मंथन भाजपामध्ये (BJP) जोरदार सुरू आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीक उत्तर प्रदेशचे निकाल कमालीचे धक्कादायक लागले होते. तसेच त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मागच्या दोन निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात निर्विवाद विजय मिळवणाऱ्या भाजपाला अवघ्या ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. आता पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवाबाबतचं चिंतन आणि मंथन भाजपामध्ये जोरदार सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक लखनौमध्ये झाली. या बैठकीत पक्षाचा पराभव झालेल्या जागांचा आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत विशेष टीमने तयार केलेला आढावा अहवालही सादर केला. त्यात पराभवाबाबतची काही धक्कादायक कारणं नमूद करण्यात आली आहेत.  

या अहवालामध्ये नेत्यांकडून जनता आणि कार्यकर्त्यांना दिली गेलेली वागणूक आणि पक्षविरोधी कारवायांचा उल्लेख करण्यात आला आगे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आढावा घेत असलेल्या भाजपाच्या विशेष टीमने हा विस्तृत अहवाल राज्याच्या नेतृत्वाकडे सुपुर्द केला आहे. या अहवालात पराभवाची अनेक कारणं नमूद करण्यात आली आहेत.

विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे पक्षाचं नुकसान झालं. एवढंच नाही, तक अनेक आमदार हे आपल्या लोकसभा मतदारसंघातील खासदारांच्या विरोधात होते. तसेच अशा मतदारसंघांमध्ये पक्षविरोधी काम केलं गेलं, असे या अहवालात म्हटलं आहे. त्याबरोबरच संविधान बदललं जाईल, असे दावे केले गेल्याने मागासवर्गीय मतदार दुरावले. तसेच ओबीसी मतदारही दुरावले. या सर्वाचा परिणाम म्हणून भाजपाचा दारुण पराभव झाला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

तसेच कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी आणि नेत्यांबाबत असलेल्या नाराजीमुळे भाजपाच्या बाजूने मतदान कमी झालं. तसेच खूप प्रयत्न करूनही ओबीसी मतदारांमधील फूट टाळता आली नाही. तसेच संविधानाच्या मुद्द्यावरून मागासवर्गीय मतं दुरावली. भाजपाच्या विशेष समितीने तीन टप्प्यांमध्ये हा अहवाल तयार केला आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षाचं भक्कम संघटन, राम मंदिरामुळे आलेली लाट यामुळे उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० पैकी अधिकाधिक जागा जिंकण्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. मात्र भाजपाला केवळ ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. तर भाजपाच्या मित्रपक्षांना ३ जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाने ३७ आणि काँग्रेसने ६ जागांवर विज मिळवला. तर इतरांच्या खात्यात एक जागा गेली. एकेकाळी उत्तर प्रदेशातील मोठी शक्ती असलेल्या बसपाला एकही जागा मिळाली नाही.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ