शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 14:27 IST

महापालिका निवडणूक काळात या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली होती...

भारतीय जनता पक्ष गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोरांची पुन्हा घर वापसी करत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कार्यक्रम पार पडेल. ही संख्या अंदाजे 5 हजार एवढी आहे. महापालिका निवडणूक काळात या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली होती. 

भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीच्या काळात कसल्याही प्रकारची चूक होऊ देऊ इच्छित नाही. यामुळेच पक्षाने आपल्या जुन्या बंडखोर आणि नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पक्षात घेण्याच्या विचार केला आहे. महापालिका निवडणूक काळात ज्या उमेदवारांना तिकीट मिळाले नाही, त्या उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांची संख्या जवळपास 5 हजार एवढी आहे. भाजपने त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आता या सर्वांची घरवापसी करण्यासंदर्भात राज्य संघटनेने निर्णय घेतला आहे. यानुसार, आज पहिल्या टप्प्यात लखनौच्या अवध भागातील बंडखोरांना पुन्हा एकदा पक्षात घेतले जाणार आहे.

आजपासून होईल सुरुवात - भारतीय जनता पक्ष आजपासून आपल्या बंडखोरांच्या घरवापसीला सुरवात करेल. आज पहिल्या टप्प्यात अवध भागातील बंडखोरांना परत घेतले जाणार आहे. आज, सुमारे 30 ते 35 बंडखोरांना लखनौ येथील मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि अवध प्रदेशाध्यक्ष कमलेश मिश्रा यांच्या उपस्थितीत या लोकांची घरवापसी होईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात सुमारे 250 बंडखोर भारतीय जनता पक्षात परतणार आहेत. यात 14 माजी नगरसेवक, तीन माजी नगराध्यक्ष आणि काही प्रभाग अध्यक्षांचाही समावेश असेल. याशिवाय, जिल्हा पातळीवरही बंडखोरांची यादी तयार करण्याची जबाबदारी जिल्हा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. आगामी काळात हे बंडखोरही भारतीय जनता पक्षात दिसू शकतात.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा