शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

देवबंदमध्ये 10 मुस्लिमांनी इस्लाम धर्म सोडून सनातन धर्मात केली घर वापसी! शुद्धीकरण यज्ञानंतर, धारण केली हिंदू नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:12 IST

...यानंतर माध्यमांसोबत बोलताना स्वामी यशवीर महाराज म्हणाले, भारतात राहणारे सर्व मुस्लीन आधी हिंदूच होते. इस्लामच्या शासन काळात त्यांचे पूर्वज अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाल बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता त्यांनी अशा सर्व लोकांना सनातन धर्मात घरवापसी करण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशातील देवबंद मधील बघरा येथील योग साधना यशवीर आश्रमात गुरुवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथील दहा मुस्लिमांनी इस्लाम सोडून सनातन धर्मातात घरवापसी केली. हे कुटुंब गुरुवारी सकाळी बघरा येथील स्वामी यशवीर जी यांच्या आश्रमात पोहोचले आणि स्वामी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर, आपण पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित केले. यज्ञानंतर त्यांनी हिंदू नावेही धारण केली. याच बरोबर आपण स्वतःच्या इच्छेने धर्म बदलत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित कुटुंबाने म्हटले आहे की, आपल्या पूर्वजांच्या सनातन धर्मात परतण्याची इच्छा आहे. त्यांच्या पूर्वजांनी साधारणपणे चाळीस-पंन्नास वर्षांपूर्वी काही कारणास्तव सनातन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. आश्रमाचे मुख्य पुजारी स्वामी यशवीर महाराज आणि आचार्य मृगेंद्र ब्रह्मचारी यांनी वैदिक मंत्रांनी शुद्धीकरण यज्ञ केला. यावेळी संबंधित मुस्लीम कुटुंबाने भक्ती-भावाने तूप आणि साहित्य अर्पण केले यानंतर, सर्व दहा सदस्यांनी त्यांची मुस्लिम नावे सोडून हिंदू नावे धारण केली.संबंधित कुटुंबातील प्रमुख राजकुमारी कश्यप आणि राजकुमाराव, त्यांचा मुलल बृजेश कश्यप यांनी घरवासीसंदर्भात आनंद व्यक्त केला आहे. यज्ञानंतर संबंधित सदस्यांवर पुष्प वर्षा करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर माध्यमांसोबत बोलताना स्वामी यशवीर महाराज म्हणाले, भारतात राहणारे सर्व मुस्लीन आधी हिंदूच होते. इस्लामच्या शासन काळात त्यांचे पूर्वज अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाल बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता त्यांनी अशा सर्व लोकांना सनातन धर्मात घरवापसी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आता देशात कसल्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नाही. सरकार चांगले काम करत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMuslimमुस्लीमHinduहिंदूHinduismहिंदुइझम