शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जे शोभायात्रेला संरक्षण देऊ शकत नाहीत, ते भगिनींचे काय संरक्षण करणार? मुख्यमंत्री योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 22:49 IST

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. यात शंका नसावी.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्साह आहे आणि तो मतांमध्ये रूपांतरित होत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. यात शंका नसावी. जनतेकडूनच विरोधकांचा खोटारडेपणाही उघड पाडला जात आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे, ते रविवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

तुष्टीकरणाच्या नावाखाली व्होट बँकेचे राजकारण -एका प्रश्नाला उत्तरात देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, "बिगरभाजप शासित राज्यांमधील हिंसाचार, हा तुष्टीकरणाच्या धोरणांचा दुष्परिणाम आहे. रामनवमी आणि होळीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये तसेच बिगर भाजपशासित राज्यांमध्ये झालेल्या दंगली म्हणजे बहुसंख्य समाजाच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली व्होट बँकेच्या राजकारणाने नेहमीच सांप्रदायिक तेढ निर्माण केली आहे."

पुढे बोलताना योगी म्हणाले, "पश्चिम बंगालमधील रामनवमीच्या शोभायात्रांवर पुन्हा झालेले हल्ले चिंतेचा विषय आहे आणि देशातील जनतेसाठी एक संदेशही आहे की, हे लोक शांततापूर्ण शोभायात्रांना संरक्षण देऊ शकत नाहीत, तर भगिनींना आणि सामान्य नागरिकांना सुरक्षा देऊ शकतील का? निवडणूक ही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांना आणि पक्षांना संदेश देण्याची सर्वोत्तम संधी असते. आपल्या मतातून यांना संदेश द्या की, आमच्या भावनांशी खेळाल आणि सुरक्षेचा भंग करणाऱ्यांना आश्रय द्याल तर, आम्हीही निवडणुकीतून त्याच पद्धतीने उत्तर देऊ." 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा