शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जे शोभायात्रेला संरक्षण देऊ शकत नाहीत, ते भगिनींचे काय संरक्षण करणार? मुख्यमंत्री योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 22:49 IST

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. यात शंका नसावी.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्साह आहे आणि तो मतांमध्ये रूपांतरित होत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. यात शंका नसावी. जनतेकडूनच विरोधकांचा खोटारडेपणाही उघड पाडला जात आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे, ते रविवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

तुष्टीकरणाच्या नावाखाली व्होट बँकेचे राजकारण -एका प्रश्नाला उत्तरात देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, "बिगरभाजप शासित राज्यांमधील हिंसाचार, हा तुष्टीकरणाच्या धोरणांचा दुष्परिणाम आहे. रामनवमी आणि होळीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये तसेच बिगर भाजपशासित राज्यांमध्ये झालेल्या दंगली म्हणजे बहुसंख्य समाजाच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली व्होट बँकेच्या राजकारणाने नेहमीच सांप्रदायिक तेढ निर्माण केली आहे."

पुढे बोलताना योगी म्हणाले, "पश्चिम बंगालमधील रामनवमीच्या शोभायात्रांवर पुन्हा झालेले हल्ले चिंतेचा विषय आहे आणि देशातील जनतेसाठी एक संदेशही आहे की, हे लोक शांततापूर्ण शोभायात्रांना संरक्षण देऊ शकत नाहीत, तर भगिनींना आणि सामान्य नागरिकांना सुरक्षा देऊ शकतील का? निवडणूक ही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांना आणि पक्षांना संदेश देण्याची सर्वोत्तम संधी असते. आपल्या मतातून यांना संदेश द्या की, आमच्या भावनांशी खेळाल आणि सुरक्षेचा भंग करणाऱ्यांना आश्रय द्याल तर, आम्हीही निवडणुकीतून त्याच पद्धतीने उत्तर देऊ." 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा