शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जे शोभायात्रेला संरक्षण देऊ शकत नाहीत, ते भगिनींचे काय संरक्षण करणार? मुख्यमंत्री योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 22:49 IST

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. यात शंका नसावी.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्साह आहे आणि तो मतांमध्ये रूपांतरित होत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. यात शंका नसावी. जनतेकडूनच विरोधकांचा खोटारडेपणाही उघड पाडला जात आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे, ते रविवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

तुष्टीकरणाच्या नावाखाली व्होट बँकेचे राजकारण -एका प्रश्नाला उत्तरात देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, "बिगरभाजप शासित राज्यांमधील हिंसाचार, हा तुष्टीकरणाच्या धोरणांचा दुष्परिणाम आहे. रामनवमी आणि होळीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये तसेच बिगर भाजपशासित राज्यांमध्ये झालेल्या दंगली म्हणजे बहुसंख्य समाजाच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली व्होट बँकेच्या राजकारणाने नेहमीच सांप्रदायिक तेढ निर्माण केली आहे."

पुढे बोलताना योगी म्हणाले, "पश्चिम बंगालमधील रामनवमीच्या शोभायात्रांवर पुन्हा झालेले हल्ले चिंतेचा विषय आहे आणि देशातील जनतेसाठी एक संदेशही आहे की, हे लोक शांततापूर्ण शोभायात्रांना संरक्षण देऊ शकत नाहीत, तर भगिनींना आणि सामान्य नागरिकांना सुरक्षा देऊ शकतील का? निवडणूक ही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांना आणि पक्षांना संदेश देण्याची सर्वोत्तम संधी असते. आपल्या मतातून यांना संदेश द्या की, आमच्या भावनांशी खेळाल आणि सुरक्षेचा भंग करणाऱ्यांना आश्रय द्याल तर, आम्हीही निवडणुकीतून त्याच पद्धतीने उत्तर देऊ." 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा