शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक; माजी मंत्र्यांच्या विधानाने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 14:31 IST

"हिंदू धर्म जर या समाजात असता तर..."

Controversial Statement about Hindu Religion: "हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही. हिंदू धर्म ही केवळ फसवणूक आहे. ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचा हा डाव आहे", असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले. लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. "हिंदू धर्म असता तर आदिवासींनाही आदर मिळाला असता. सर्व विषमतेचे कारण ब्राह्मणवाद आहे. दलित आणि आदिवासींना जाळ्यात अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. ब्राह्मणवादाची मुळे खूप खोलवर रूजवलेली आहेत. हिंदू धर्म असता तर या समाजात मागासलेल्यांचा सन्मान झाला असता, पण आदिवासी समाजातून येणाऱ्या राष्ट्रपतींना मंदिरात जाण्यापासून रोखले जाते ही तर मोठी शोकांतिका आहे", असेही ते म्हणाले.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ ट्विट केला. चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मौर्य हिंदू धर्माच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. "द्रौपदी मुर्मू जी राष्ट्रपती झाल्यानंतरही त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले, कारण त्या आदिवासी समाजातील आहेत. आदिवासी समाज हिंदू असता तर त्यांना अशी वागणूक दिली असती का? ब्राह्मण देवतांचे चतुर लोक अजूनही आम्हाला आदिवासीच मानतात. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबाबतही असेच घडले आहे. ज्याला तुम्ही हिंदू धर्म म्हणता, तुमचे सर्वस्व अर्पण करता, हिंदू-मुस्लीम असे वाद होऊन दंगली करता, रक्त सांडता, ते केवळ तुमचे अज्ञान आहे," असे मौर्य म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गंगाजलाने धुण्याबाबत...

'जेव्हा अखिलेश यादव मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले, तेव्हा या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गोमूत्राने धुतले. एवढ्यानेही मन तृप्त झाले नाही, तेव्हा घराला गंगाजलाने आंघोळ घालण्यात आली. एखाद्या ब्राह्मण मुख्यमंत्री असता तर त्यानंतर घराला गोमूत्र आणि गंगाजलाने धुण्याची हिंमत कुणाची असती का? अखिलेश यादव यांचा जन्म मागासलेल्या समाजात झाल्यामुळे त्यांच्याबाबत असे करण्यात आले. आदिवासी-दलित आणि मागास हे कोण आहेत, ज्यांना पूर्वी शूद्र म्हटले जात होते. त्यांना प्राण्यांपेक्षाही वाईट जीवन जगण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे सावध राहा, तुम्ही ज्याला धर्म मानता तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यासाठी व्यवसाय म्हणजे तुमची फसवणूक आहे", असेही ते म्हणाले.

टॅग्स :HinduहिंदूUttar Pradeshउत्तर प्रदेशministerमंत्रीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी