शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 20:35 IST

Keshav Prasad Maurya News: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असल्याचं विधान केलं आहे. केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, जर मी संघटनेमध्ये नसतो तर राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो नसतो.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असल्याचं विधान केलं आहे. केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, जर मी संघटनेमध्ये नसतो तर राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो नसतो. संघटनाच निवडणूक लढते आणि संघटनेमधूनच लोक सरकारमध्ये जातात. मागच्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी सुरू आहेत. तसेच त्यामधून सरकार मोठं की पक्ष संघटना हा वाद पुढे आला आहे.

दरम्यान, केशव प्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेशात सध्या गाजत असलेल्या नजूल विधेयकाबाबत सांगितलं की, हे विधेयक समितीकडे पाठण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या त्याबाबत काही बोलणं योग्य ठरणार नाही. मला तुमच्या भावना समजल्या आहेत. याबाबत काही मार्ग निघतो का हे पाहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच जो निर्णय असेल तो राज्य सरकारला सांगितलं जाईल. 

यावेळी केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, समाजवादी पक्ष आता समाप्तवादी पक्ष बनणार आहे. खोटं बोलून काही जागा त्यांनी जिंकल्या. ते केवळ अपप्रचार करतात. त्यांच्याकडे कुठलंही काम नाही आहे. ते सत्तेत येण्याची २०२७ मध्येही काही शक्यता नाही आणि २०३७ मध्येही काही शक्यता दिसत नाही. समाजवादी पक्ष पीडीएच्या नावाने ब्राह्मणांची दिशाभूल करत आहे. त्यांचं नातं हे गुंड आणि माफियांशी आहे. त्यांनी एकदा दिशाभूल करून जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र असं पुन्हा पुन्हा घडणार नाही. .येणाऱ्या दिवसांमध्ये जनता त्यांना धडा शिकवेल.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा